शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आस!

By admin | Updated: April 8, 2017 01:13 IST

शेतमालास हवा योग्य भाव : उगवा येथील शेतकऱ्यांच्या भावना

संतोश येलकर - अकोलासततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र संपविण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी आणि शेतमालास योग्य भाव देण्याचे धोरण केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा भावना जिल्ह्यातील उगवा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसदारांसह शेतकऱ्यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.नापिकी आणि कर्जाच्या चक्रव्यूहात अडकल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीची आस निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्त करावे, यासंबंधीची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर सन २०१२ ते २०१६ या पाच वर्षांच्या कालावधीत १० शेतकरी आत्महत्या झालेल्या खारपाणपट्ट्यातील अकोला तालुक्यातल्या उगवा येथील शेतकऱ्यांच्या भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या असता, शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने शेतमालास योग्य भाव देण्याचे धोरण सरकारने निश्चित केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा भावनाही या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसदारांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.खर्चही निघत नाही; कर्जाची परतफेड कशी करणार?पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीची मशागत, बियाणे, पेरणीसाठी खर्च केल्यानंतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व इतर खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण होत असताना, कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, शेतमालाला योग्य भाव देण्याचे धोरण निश्चित करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत उगवा येथील शेतकऱ्यांनी मांडले.भाव अत्यल्प; सोयाबीन, तूर, हरभरा घरातच!यावर्षी सोयाबीन, तूर, हरभरा पिकाचे उत्पादन चांगले झाले; मात्र शेतमालास बाजारात अत्यल्प भाव मिळत आहे. शेतमालास कमी भाव मिळत असल्याने खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी शेतमाल अद्यापही घरातच पडून आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतमाल घरातच ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, अशी व्यथा शेतकरी श्याम पाठक यांनी मांडली.