शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आस!

By admin | Updated: April 8, 2017 01:13 IST

शेतमालास हवा योग्य भाव : उगवा येथील शेतकऱ्यांच्या भावना

संतोश येलकर - अकोलासततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र संपविण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी आणि शेतमालास योग्य भाव देण्याचे धोरण केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा भावना जिल्ह्यातील उगवा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसदारांसह शेतकऱ्यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.नापिकी आणि कर्जाच्या चक्रव्यूहात अडकल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीची आस निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्त करावे, यासंबंधीची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर सन २०१२ ते २०१६ या पाच वर्षांच्या कालावधीत १० शेतकरी आत्महत्या झालेल्या खारपाणपट्ट्यातील अकोला तालुक्यातल्या उगवा येथील शेतकऱ्यांच्या भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या असता, शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने शेतमालास योग्य भाव देण्याचे धोरण सरकारने निश्चित केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा भावनाही या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसदारांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.खर्चही निघत नाही; कर्जाची परतफेड कशी करणार?पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीची मशागत, बियाणे, पेरणीसाठी खर्च केल्यानंतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व इतर खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण होत असताना, कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, शेतमालाला योग्य भाव देण्याचे धोरण निश्चित करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत उगवा येथील शेतकऱ्यांनी मांडले.भाव अत्यल्प; सोयाबीन, तूर, हरभरा घरातच!यावर्षी सोयाबीन, तूर, हरभरा पिकाचे उत्पादन चांगले झाले; मात्र शेतमालास बाजारात अत्यल्प भाव मिळत आहे. शेतमालास कमी भाव मिळत असल्याने खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी शेतमाल अद्यापही घरातच पडून आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतमाल घरातच ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, अशी व्यथा शेतकरी श्याम पाठक यांनी मांडली.