शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

सोनाळा येथे शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: May 16, 2014 20:09 IST

सोनाळा येथील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

उरळ: उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सोनाळा येथील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. मृतकाच्या खिशात त्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्याच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडल्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. उरळ पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बाळापूर तालुक्यातील सोनाळा येथील दीपक शंकर मामनकर (३२) नामक शेतकर्‍याने शुक्रवारी सकाळी विठ्ठल ठाकरे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक दीपक मामनकर यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी पोलिस अधीक्षक लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली आहे. अकोल्यातील उमरी येथील डॉ. सुनीता मेंडे यांनी हर्बल लाईन या कंपनीत नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून आपणाकडून २ लाख १२ हजार रुपये घेतले; परंतु अद्यापपर्यंत नोकरी मिळाली नाही. वारंवार तगादा लावूनही त्यांनी पैसे परत केले नाही, म्हणून आपण जगाचा निरोप घेत आहोत, असा मजकूर या चिठ्ठीत आहे. परंतु, त्यावर मृतकाची स्वाक्षरी नसल्यामुळे ही चिठ्ठी मृतक दीपक यांनीच लिहिलेली आहे का, याचा शोध सुरू असल्याचे उरळ पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृतक दीपक मामनकर यांच्यावर बँकेचे १ लाख २० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. भगवान डिगांबर उगले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दीपक यांच्या पश्चात १ मुलगा व पत्नी असा परिवार आहे. पुढील तपास पीएसआय संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनात जमादार कैलास पेटकर, पोकॉ शालिग्राम इंगळे करीत आहेत.