शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

संप काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच!

By admin | Updated: June 7, 2017 01:54 IST

विदर्भ-मराठवाड्यातील सहा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/ वर्धा/ बुलडाणा/ नाशिक/ बीड/ उस्मानाबाद : संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कर्जबारीपणाला कंटाळून विदर्भातील आणि मराठवड्यातील प्रत्येकी शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याच्या घटना घडल्या आहेत.अकोट (जि. अकोला) तालुक्यातील उमरा येथील गणेश काळबेंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ जून रोजी उघडकीस आली. गणेश काळबेंडे यांच्याकडे अडीच एकर शेती होती. कर्जाचा डोेंगर आणि चालु हंगामासाठी बी-बियाण्याची तजवीज करण्याचा ताळमेळ बसत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. पेरणीसाठी पैशाची सोय तसेच सेवा सहकारी सोसायटीसह बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतच त्यांनी अखेर ६ जून रोजी पत्नी व दोन मुले गावी तर एक मुलगा शेतात गेल्यानंतर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील परतापूर येथे संजय रामराव घनवट (४६) या शेतकऱ्याने सोमवारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच होता. त्यातच उपवर मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे असा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. या ताणातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी आहे.वर्धा जिल्ह्याच्या आकोलीमध्ये ईश्वर बळीराम इंगळे (५६) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ईश्वर यांनी शेतीसाठी बँकेतून जवळपास ३ लाखाचे कर्ज घेतले होते. त्यातच खरीपाच्या तोंडावर त्यांच्याकडील एक बैल दगावला. परिणामी, मशागतीची कामे कशी करावी असा प्रश्न त्यांना भेडसावत होता.उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कलदेव लिंबाळा येथील गुरुनाथ गुंडू ढोणे (२९) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री कर्जास कंटाळून गळफास घेतला. त्याच्या नावे साडेतीन एकर शेती आहे़ यातील उत्पन्नावर उदरनिर्वाह भागत नसल्याने त्याने कर्ज काढले होते़ हे कर्ज भरण्याची मुदत संपत आल्याने तो हवालदिल झाला होता. शिवाय, पेरण्या तोंडावर आल्याने खत-बियाणासाठी पैश्याची जुळवाजुळव करण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील हिवरवाडीतील सूर्यभान बाबूराव गुंजाळ (५५) या शेतकऱ्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विंवचनेतून विषप्राशन केले. जिल्हा रुग्णालयात मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी आंदोलनात सक्र ीय सहभाग घेतलेल्या येवला तालुक्यातील पिंपरी येथील नवनाथ चांगदेव भालेराव (३०) या तरु ण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. भालेराव यांच्यावर सुमारे साडेचार लाखांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.