शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

नादुरुस्त वीज रोहित्रांमुळे शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी ...

बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याकडे महावितरणने लक्ष देऊन रोहित्रांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

बाळापूर येथील काळबाई शेत शिवारातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. काळबाई शिवारातील शेतकऱ्यांनी रबी हंगामात कांदा, गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. सद्य:स्थितीत पिके बहरलेली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. गत पंधरा दिवसांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, अद्यापही दुरुस्ती न केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन काळबाई शिवार व तालुक्यातील इतर नादुरुस्त असलेले रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

थकीत वीज बिलांची वसुली

थकीत वीज बील भरल्याशिवाय रोहित्र दुरुस्त न करण्याची तंबी अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अवाच्या सव्वा आलेले वीज बिल भरण्यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील सर्व वीज रोहित्र तात्काळ सुरू करण्याचा आदेश असतानाही बाळापूर उपविभागातील वीज रोहित्रे दुरुस्त करण्यासाठी वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.