शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त वीज रोहित्रांमुळे शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी ...

बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याकडे महावितरणने लक्ष देऊन रोहित्रांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

बाळापूर येथील काळबाई शेत शिवारातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. काळबाई शिवारातील शेतकऱ्यांनी रबी हंगामात कांदा, गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. सद्य:स्थितीत पिके बहरलेली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. गत पंधरा दिवसांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, अद्यापही दुरुस्ती न केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन काळबाई शिवार व तालुक्यातील इतर नादुरुस्त असलेले रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

थकीत वीज बिलांची वसुली

थकीत वीज बील भरल्याशिवाय रोहित्र दुरुस्त न करण्याची तंबी अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अवाच्या सव्वा आलेले वीज बिल भरण्यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील सर्व वीज रोहित्र तात्काळ सुरू करण्याचा आदेश असतानाही बाळापूर उपविभागातील वीज रोहित्रे दुरुस्त करण्यासाठी वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.