शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

नादुरुस्त वीज रोहित्रांमुळे शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी ...

बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याकडे महावितरणने लक्ष देऊन रोहित्रांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

बाळापूर येथील काळबाई शेत शिवारातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. काळबाई शिवारातील शेतकऱ्यांनी रबी हंगामात कांदा, गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. सद्य:स्थितीत पिके बहरलेली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. गत पंधरा दिवसांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, अद्यापही दुरुस्ती न केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन काळबाई शिवार व तालुक्यातील इतर नादुरुस्त असलेले रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

थकीत वीज बिलांची वसुली

थकीत वीज बील भरल्याशिवाय रोहित्र दुरुस्त न करण्याची तंबी अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अवाच्या सव्वा आलेले वीज बिल भरण्यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील सर्व वीज रोहित्र तात्काळ सुरू करण्याचा आदेश असतानाही बाळापूर उपविभागातील वीज रोहित्रे दुरुस्त करण्यासाठी वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.