शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पिंपळखुटा परिसरात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST

नासीर शेख खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री, चतारी, पिंपळखुटा, चांगेफळ, शिरपूर, राहेर, आडगाव, वाहाळा, चान्नी आदी परिसरात पावसाने गेल्या ...

नासीर शेख

खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री, चतारी, पिंपळखुटा, चांगेफळ, शिरपूर, राहेर, आडगाव, वाहाळा, चान्नी आदी परिसरात पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाअभावी परिसरातील पिके करपण्याच्या मार्गावर असून, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर द्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले आहे ; मात्र महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विविध पिकांची पेरणी केली होती, परंतु कपाशी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशी मोडून दुबार पेरणी केली. अशातच चार ते पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी कृषी पंपाद्वारे पिकांना वाचवण्यासाठी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

------------------------

सस्ती येथील वीज उपकेंद्राचा मनमानी कारभार !

सस्ती वीज उपकेंद्राचा गेल्या काही महिन्यापासून मनमानी कारभार सुरू असून, याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित वरिष्ठांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. थ्री फेज असो किंवा सिंगल फेज रात्रंदिवस वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पिके संकटात सापडले आहेत. अजून येत्या तीन ते चार दिवस पाऊस पडला नाही तर दुबार आणि काही परिसरात तिबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

----------------------

पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारल्याने पिकांना वाचवण्यासाठी कृषी पंपाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली, परंतु महावितरण विभागाच्या शून्य कारभारामुळे रात्रंदिवस वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दुबार पेरणीचे संकट समोर आहे.

-राजेश जयराम कीर्तने, शेतकरी, चतारी.

-----------------

व्याजाने पैसे घेऊन पिकांची पेरणी केली आहे ; मात्र पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. कृषी पंपाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला असून, वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

-मोहम्मद आसीम, शेतकरी शिरपूर, चांगेफळ.

------------------

कपाशी पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने पीक मोडून दुबार पेरणी केली. अशातच पावसाने दडी मारल्याने स्प्रिंकलर द्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले ; मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

-नाजुकराव देशमुख, शेतकरी, पिंपळखुटा.