शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शेतक-यांनी बहुपीक शेती पद्धत वापरावी!

By admin | Updated: May 6, 2017 02:43 IST

कृषी विद्यापीठाचा सल्ला

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून, शेतकर्‍यांनी आता बहुपीक व एकीकृत शेती पद्धतीचा वापर करावा आणि जलसंधारण व समतल रेषेवर भर देण्याची गरज असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकर्‍यांना दिला आहे.शेतीमध्ये नियोजन महत्त्वाचे आहे. याकरिता साधन संपत्ती, जमीन, पाणी, भांडवल, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ व गत काळातील ३ वर्षांचा अनुभव विचारात घेऊन शेतकर्‍यांना खरीप हंगामाचे नियोजन करावे लागेल. शेतीतील अनिश्‍चितता दूर करण्यासाठी बहुपीक पद्धतीचा किंवा एकीकृत शेतीचा वापर, मिश्र पीक, आंतर पिकाचा वापर, निविष्ठा व शेती खर्चाची तरतूद करणे आवश्यक आहे. बियाणे खरेदी करताना प्रमाणित व खात्रीच्या बियाण्यांची खरेदी करावी, या बियाण्यांची घरी उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार बियाण्यांचे प्रमाण ठरवून झाडांची प्रतिहेक्टरी योग्य संख्या ठेवावी लागणार आहे. या सर्व पद्धतीचा शेतकर्‍यांनी वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. ज्या शेतकर्‍यांनी समतल रेषेस समांतर किंवा उताराला आडवी पेरणी केली होती. त्यांना चांगला फायदा झाल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले आहे. या वर्षी शेतकर्‍यांनी हा प्रयोग करावा. या पद्धतीने पेरणी केल्यास शेतातील पाणी वाहून न जाता वरंब्याला अडून शेतात मुरते. त्यामुळे पिकाला दिलेली खते वाहून जात नाहीत. येणार्‍या हंगामात निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड आणि कीड, रोगाविषयी जागरू क राहून त्याचे एकात्मिक व्यवस्थापन शिवार, गावपातळीवर सामूहिकरीत्या करणे आवश्यक असल्याचा सल्लाही कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना दिला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून, जलसंधारणाची कामे उरकवावी, उताराला आडवी पेरणी केल्यास त्याचा फायदा शेतकर्‍यांना मिळतो. वेळेवर पेरणी करणे गरजेचे आहे. -शेतीचे नियोजन करणे आवश्यक असून, शेतकर्‍यांनी समतल चर, उताराला आडवी पेरणी, असे प्रयोग केल्यास त्याचा उत्पादनात फायदा होतो.- डॉ. व्ही.एम. भाले,अधिष्ठाता कृषी, डॉ. पंदेकृवि, अकोला.