शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

शेतक-यांनी बहुपीक शेती पद्धत वापरावी!

By admin | Updated: May 6, 2017 02:43 IST

कृषी विद्यापीठाचा सल्ला

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून, शेतकर्‍यांनी आता बहुपीक व एकीकृत शेती पद्धतीचा वापर करावा आणि जलसंधारण व समतल रेषेवर भर देण्याची गरज असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकर्‍यांना दिला आहे.शेतीमध्ये नियोजन महत्त्वाचे आहे. याकरिता साधन संपत्ती, जमीन, पाणी, भांडवल, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ व गत काळातील ३ वर्षांचा अनुभव विचारात घेऊन शेतकर्‍यांना खरीप हंगामाचे नियोजन करावे लागेल. शेतीतील अनिश्‍चितता दूर करण्यासाठी बहुपीक पद्धतीचा किंवा एकीकृत शेतीचा वापर, मिश्र पीक, आंतर पिकाचा वापर, निविष्ठा व शेती खर्चाची तरतूद करणे आवश्यक आहे. बियाणे खरेदी करताना प्रमाणित व खात्रीच्या बियाण्यांची खरेदी करावी, या बियाण्यांची घरी उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार बियाण्यांचे प्रमाण ठरवून झाडांची प्रतिहेक्टरी योग्य संख्या ठेवावी लागणार आहे. या सर्व पद्धतीचा शेतकर्‍यांनी वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. ज्या शेतकर्‍यांनी समतल रेषेस समांतर किंवा उताराला आडवी पेरणी केली होती. त्यांना चांगला फायदा झाल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले आहे. या वर्षी शेतकर्‍यांनी हा प्रयोग करावा. या पद्धतीने पेरणी केल्यास शेतातील पाणी वाहून न जाता वरंब्याला अडून शेतात मुरते. त्यामुळे पिकाला दिलेली खते वाहून जात नाहीत. येणार्‍या हंगामात निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड आणि कीड, रोगाविषयी जागरू क राहून त्याचे एकात्मिक व्यवस्थापन शिवार, गावपातळीवर सामूहिकरीत्या करणे आवश्यक असल्याचा सल्लाही कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना दिला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून, जलसंधारणाची कामे उरकवावी, उताराला आडवी पेरणी केल्यास त्याचा फायदा शेतकर्‍यांना मिळतो. वेळेवर पेरणी करणे गरजेचे आहे. -शेतीचे नियोजन करणे आवश्यक असून, शेतकर्‍यांनी समतल चर, उताराला आडवी पेरणी, असे प्रयोग केल्यास त्याचा उत्पादनात फायदा होतो.- डॉ. व्ही.एम. भाले,अधिष्ठाता कृषी, डॉ. पंदेकृवि, अकोला.