शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शेतक-यांनी हरितगृह शेती विकासावर भर द्यावा

By admin | Updated: September 2, 2015 02:18 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त काळे यांचे प्रतिपादन.

अकोला : आता पर्जन्यमानावर आधारित शेती करावी लागणार असून, पाण्याची बचत आणि उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी हरितगृह, शेडनेट शेती विकासावर लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी, सहकार व यांत्रिकीकरण विभागाचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार काळे यांनी मंगळवारी येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार व शिक्षण संचालनालय तसेच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदन सभागृहात ह्यवातावरणातील घटकांचे आधुनिक कृषी संरचनेतील महत्त्वह्ण या विषयावर १ ते ८ सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काळे बोलत होते. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, अधिष्ठाता डॉ. विलास भाले, डॉ. सुधीर वडतकर,डॉ. तामगाडगे, डॉ. प्रदीप बोरकर, तसेच प्रशिक्षण समन्वयक डॉ. सूचिता गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी काळे यांनी दरवर्षी अन्नधान्याच्या होत असलेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त करताना, कृषी संरचनेत वातावरणातील घटकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. याकरिता कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांसह, कृषीशी निगडित संशोधन संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. संरक्षित शेती करण्यासाठी शासनाच्या विविध योजना असून, शेडनेट, हरितगृह, जनावरांचा गोठा, मृद संधारण संरचना इत्यादी सर्व पर्जन्य आधारित शेती पद्धतीसाठी या योजनांचा शेतकर्‍यांना लाभ घेता येणार आहे. डॉ. दाणी यांनी काटेकोर शेती करण्याची गरज असल्याचे सांगितले. अन्नसुरक्षेसाठी संरक्षित शेती काळाची गरज असल्याचे डॉ. सुधीर वडतकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील कोलकाता, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील कृषी तज्ज्ञ, कृषी अधिकार्‍यांचा सहभाग आहे.