शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी हरितगृह शेती विकासावर भर द्यावा

By admin | Updated: September 2, 2015 02:18 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त काळे यांचे प्रतिपादन.

अकोला : आता पर्जन्यमानावर आधारित शेती करावी लागणार असून, पाण्याची बचत आणि उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी हरितगृह, शेडनेट शेती विकासावर लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी, सहकार व यांत्रिकीकरण विभागाचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार काळे यांनी मंगळवारी येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार व शिक्षण संचालनालय तसेच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदन सभागृहात ह्यवातावरणातील घटकांचे आधुनिक कृषी संरचनेतील महत्त्वह्ण या विषयावर १ ते ८ सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काळे बोलत होते. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, अधिष्ठाता डॉ. विलास भाले, डॉ. सुधीर वडतकर,डॉ. तामगाडगे, डॉ. प्रदीप बोरकर, तसेच प्रशिक्षण समन्वयक डॉ. सूचिता गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी काळे यांनी दरवर्षी अन्नधान्याच्या होत असलेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त करताना, कृषी संरचनेत वातावरणातील घटकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. याकरिता कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांसह, कृषीशी निगडित संशोधन संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. संरक्षित शेती करण्यासाठी शासनाच्या विविध योजना असून, शेडनेट, हरितगृह, जनावरांचा गोठा, मृद संधारण संरचना इत्यादी सर्व पर्जन्य आधारित शेती पद्धतीसाठी या योजनांचा शेतकर्‍यांना लाभ घेता येणार आहे. डॉ. दाणी यांनी काटेकोर शेती करण्याची गरज असल्याचे सांगितले. अन्नसुरक्षेसाठी संरक्षित शेती काळाची गरज असल्याचे डॉ. सुधीर वडतकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील कोलकाता, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील कृषी तज्ज्ञ, कृषी अधिकार्‍यांचा सहभाग आहे.