शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

शेतकरी बचतगट तयार करणार सेंद्रिय खते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 10:43 IST

Agriculture Sector News सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

अकोला: जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर आणि पारंपरिक पिके घेण्याच्या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यानुषंगाने पीक पद्धतीत सुधारणा करून जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढावा या दृष्टीने शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शेतकरी बचतगटांकडून तयार करण्यात आलेली सेंद्रिय खते शेतीमध्ये वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यास मदत होणार आहे.

असे तयार करणार सेंद्रिय खते!

शेतातील काडीकचरा, शेणखत, माती आणि पालापाचोळा कुजवणारे जिवाणू इत्यादी घटकांचा वापर करून शेतकरी बचतगटांकडून सेंद्रिय खते करण्यात येणार आहेत.

 

जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

- शंकर तोटावार, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र