शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सावरखेडच्या शेतकऱ्यांची पिकांसह जमीन गेली खरडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST

पातूर: तालुक्यातील सावरखेडा येथील तीन शेतकऱ्यांची जमीन पिकांसह खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस ...

पातूर: तालुक्यातील सावरखेडा येथील तीन शेतकऱ्यांची जमीन पिकांसह खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. मेडशी वन परिक्षेत्रातील कोलदरीच्या जंगलातून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्याने सावरखेड येथील विजय हिरामण राठोड, वसंत महादेव देवकर आणि भास्कर राऊत यांच्या शेतात पाणी शिरून शेतजमीन पिकांसह खरडून गेली आहे.

सावरखेड येथील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनला पसंती देत पेरणी केली. परिसरात सोयाबीनचा पेरा चांगला आहे. सद्यस्थितीत पीक शेतात बहरलेले आहे. रविवारी मेडशी वनपरिक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी शेतात शिरल्याने तीन एकरावरील पीक जमिनीसह खरडून गेले आहे. याबाबत माहिती मिळताच तलाठी एम. एन. पठाण यांनी नुकसानाचा सर्व्हे सोमवारी केला असून, अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. (फोटो)

------------------

नाल्याचे रुंदीकरण करा; गतवर्षीही जमीन खरडली

शेतकरी विजय हिरामण राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची गतवर्षी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पिकासह शेती वाहून गेली होती. त्यामुळे शेताला संरक्षण म्हणून आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम शेतकरी विजय हिरामण राठोड यांनी स्वखर्चाने केले होते, मात्र रविवारी मध्यरात्री आलेल्या पावसामुळे पाणी शेतात शिरले आहे. दरवर्षी हीच समस्या असल्याने शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

230821\1956img-20210823-wa0270.jpg

शेती खरडून गेली