राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकर्यांनी बियाणे खरेदीला सुरूवात केली असतानाच, अनेक ठिकाणी बीटी कापसाच्या बियांण्याचा काळाबाजार होत असल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ८३0 रू पयाचे पाकीट अव्वाच्या सव्वा दराने विकले जात आहे. सतत दोन वर्षापासून अतवृष्टी आणि अवर्षण स्थितीमुळे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्यांकडे पेरणीसाठी पैसा नसून, कर्जाचे पुर्नगठणही झाले नसल्याने शेतकर्यांना पीक कर्ज मिळणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर शेतकरी सैरभैर झाला आहे. काहींनी सोनं गहाण ठेऊन बी-बीयाणे खरेदीसाठीची तयारी केली आहे. शासनाने बीटी कापसाच्या बियाणे पाकीटची किंमत १00 रूपयाने कमी केली आहे. त्यामुळे ९३0 रू पयाचे पाकीट ८३0 रूपयाला विकणे क्रमप्राप्त आहे; पण शेतकर्यांची सर्रास लूट होत असून, हे पाकीट १२00 ते १५00 रू पयाने विकले जात आहे. यामध्ये एका नामांकीत कंपनीच्या बीटी कापसाचा समावेश आहे. गतवर्षी कापसाला मागे टाकत सोयाबीनने आघाडी घेतली होती. विदर्भात जवळपास २0 लाख हेक्टरवर सोयाबीन तर कापूस १५ लाख हेक्टरवर शेतकर्यांनी पेरा केला होता. यावर्षी बीटी कापसाची मागणी वाढली आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा मोजक्या शेतकर्यांनी बी.टी. कापसाचे बियाणे खरेदी केले. मूग,उडीद, तुर, ज्वारी बियाण्यांची अद्याप हवी तेवढी मागणी नाही. आणखी पाऊस आल्यानंतरच शेतकरी इतर बियाणे खरेदी करतील असा प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे. यावर्षी आतापासूनच शेतकर्यांनी सोयाबीन खरेदीवर भर दिला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचीच आघाडी असून, पाऊस आल्यानंतरच शेतकरी कापूस व इतर बियाणे खरेदी करतील. त्यामुळे यावर्षी शेतकर्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
बियाणे खरेदीसाठी शेतक-यांची धावपळ
By admin | Updated: June 12, 2015 02:03 IST