शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

चोहोट्टाबाजारमध्ये शेतकऱ्यांनी काढला मोर्चा

By admin | Updated: June 7, 2017 19:19 IST

दुध, कांदे,भाज्या फेकल्या रस्त्यावर : मोर्चास उत्स्फुर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

चोहोट्टा बाजार : संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा देत संपूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामीण भागातला शेतकरीही आता रस्त्यावर उतरला आहे. ७ जून रोजी चोहोट्टा बाजार येथे संपावरील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी करीत मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघाला.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज मिळावे, पशूधन विमा लागू करण्यात यावा, आदी विषयावर शेतकऱ्यांच्या वतीने रमेश वानखडे, आनंदा पाचबोले, सुनील अघडते, कालेखाँ पठाण, गोपाल सपकाळ, कपिल ढोके, राजू खोटरे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांनी दूध, कांदा व इतर भाज्या रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, दहीहांड्याचे ठाणेदार गणेश वनारे यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी गोपाल सपकाळ, रमेश वानखडे, आनंदा पाचबोले, विशाल काकड, दिलीप वडाळ, सुनील अघडते, कपिल ढोके, नीलेश मानकर, मनीष मोडक, राजू खोटरे, अतुल खोटरे, शंकरराव तुरूक, विलास साबळे, गोकुळ तुरूक, संजय बागलकर, सुनील वहिले, नरेंद्र म्हैसने, हर्षल ठाकरे, स्वप्निल अरबट, राजू शेळके, गंगाधर बुंदे, बाळू इंगळे, मुकींदा वसू, गजानन पाचबोले, उमेश शेगोकार यांचेसह चोहोट्टा, दनोरी, पळसोद, करतवाडी, करोडी, पिलकवाडी, नखेगाव, टाकळी खुर्द, टाकळी बु., कावसा, कुटासा, देवर्डा, निजामपूरसह इतर गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.