शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी आधारासाठी ‘दिलासा’

By admin | Updated: September 21, 2015 01:41 IST

अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी १६९१ कुटुंबांचे होणार सर्वेक्षण.

संतोष येलकर / अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून, त्याद्वारे कायमस्वरूपी आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दिलासा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ६९१ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शनिवारी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. कधी जादा तर कधी कमी पाऊस, अवकाळी व गारपिटीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नापिकीमुळे निर्माण होणार्‍या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडल्याच्या स्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येनंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबांची प्रचंड वाताहत होते, उदरनिर्वाहासह आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना एक लाखाची सरकारी मदत दिली जाते; मात्र कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ही मदत पुरेशी ठरत नाही. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय आणि प्रशिक्षणाच्या उपाययोजना राबवून, त्याद्वारे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी मदतीचा आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून दिलासा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सन २00१ ते सप्टेंबर २0१५ या १५ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या १ हजार ६९१ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या आवश्यकतेनुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना खासगी नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय आणि व्यवसायाचे प्रशिक्षण इत्यादी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या उपाययोजनांद्वारे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी दिलासा अभियानात शासकीय-निमशासकीय आणि खासगी पद्धतीने मदत करण्यात येणार आहे.