शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी आधारासाठी ‘दिलासा’

By admin | Updated: September 21, 2015 01:41 IST

अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी १६९१ कुटुंबांचे होणार सर्वेक्षण.

संतोष येलकर / अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून, त्याद्वारे कायमस्वरूपी आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दिलासा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ६९१ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शनिवारी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. कधी जादा तर कधी कमी पाऊस, अवकाळी व गारपिटीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नापिकीमुळे निर्माण होणार्‍या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडल्याच्या स्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येनंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबांची प्रचंड वाताहत होते, उदरनिर्वाहासह आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना एक लाखाची सरकारी मदत दिली जाते; मात्र कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ही मदत पुरेशी ठरत नाही. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय आणि प्रशिक्षणाच्या उपाययोजना राबवून, त्याद्वारे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी मदतीचा आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून दिलासा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सन २00१ ते सप्टेंबर २0१५ या १५ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या १ हजार ६९१ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या आवश्यकतेनुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना खासगी नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय आणि व्यवसायाचे प्रशिक्षण इत्यादी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या उपाययोजनांद्वारे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी दिलासा अभियानात शासकीय-निमशासकीय आणि खासगी पद्धतीने मदत करण्यात येणार आहे.