शहरं
Join us  
Trending Stories
1
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
4
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
5
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
6
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
7
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
10
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
11
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
12
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
13
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
14
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
15
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
16
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी आधारासाठी ‘दिलासा’

By admin | Updated: September 21, 2015 01:41 IST

अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी १६९१ कुटुंबांचे होणार सर्वेक्षण.

संतोष येलकर / अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून, त्याद्वारे कायमस्वरूपी आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दिलासा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ६९१ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शनिवारी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. कधी जादा तर कधी कमी पाऊस, अवकाळी व गारपिटीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नापिकीमुळे निर्माण होणार्‍या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडल्याच्या स्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येनंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबांची प्रचंड वाताहत होते, उदरनिर्वाहासह आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना एक लाखाची सरकारी मदत दिली जाते; मात्र कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ही मदत पुरेशी ठरत नाही. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय आणि प्रशिक्षणाच्या उपाययोजना राबवून, त्याद्वारे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी मदतीचा आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून दिलासा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सन २00१ ते सप्टेंबर २0१५ या १५ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या १ हजार ६९१ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या आवश्यकतेनुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना खासगी नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय आणि व्यवसायाचे प्रशिक्षण इत्यादी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या उपाययोजनांद्वारे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी दिलासा अभियानात शासकीय-निमशासकीय आणि खासगी पद्धतीने मदत करण्यात येणार आहे.