शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाचे स्वरूप मर्यादित!

By admin | Updated: June 8, 2017 01:37 IST

संप शेतकरी करीत नसून, गुंड करीत आहेत- भाजप प्रवक्त्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफीसाठी सुरू असलेला संप शेतकऱ्यांचा नाही. तो काही गुंड आणि राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे आणि हे आंदोलन केवळ दोन ते तीन जिल्ह्यांपुरतेच मर्यादित असून, त्याला प्रसारमाध्यमांकडून व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप सरकार हे शेतकऱ्यांप्रति संवेदनशील असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २६ मे रोजी तीन वर्षे पूर्ण केली. मोदी सरकारने तीन वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी भाजपतर्फे पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले, भाजपचे शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, गिरीश जोशी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात झाल्यात आणि आता तेच शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहेत. राज्यामध्ये केवळ दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संप सुरू असून, या संपामध्ये शेतकरी सहभागी नाहीत; परंतु त्याला काही लोक व्यापक स्वरूप देण्याचा केवळ देखावा करीत आहेत, असा दावा त्यांनी केला. अन्नदाता आपला शेतमाल रस्त्यावर फेकून कसा आंदोलन करेल, हा संप शेतकऱ्यांच्या नसून, गुंडांचा असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला. भाजप सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत ११ हजार कोटी ९५ कोटी रुपयांची मदत दिली. पीक विम्याचा सात हजार कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला. कर्जमाफी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या संपणाऱ्या नाहीत. त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करीत असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.आ. सावरकर मदतीला धावलेभाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यावर पत्रकारांनी शेतकरी संपाच्या मुद्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. तेव्हा आमदार रणधीर सावरकर प्रदेश प्रवक्त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. नाफेडची तूर खरेदी, शेततळे, राजीव गांधी जीवनदायी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल, यासाठी आम्ही शासनदरबारी सातत्याने प्रश्न मांडत असतो, असे सांगत आ. सावरकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.