शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची एकाकी झुंज!

By admin | Updated: February 27, 2016 01:36 IST

कुठे गेले शेतकरी नेते, संघटना; कंपन्यांशी हितसंबंध जोपासण्यासाठी शेतक-यांचे आयुष्य पणाला.

अकोला: आर्थिक विवंचना दूर व्हावी, यासाठी शेतकरी एकीकडे पीक पद्धतीत बदल करीत आहेत; तर दुसरीकडे बोगस बियाणे, रोपांच्या माध्यमातून होणारी शेतकर्‍यांची फसवणूक रोखण्याची जबाबदारी असलेली शासकीय यंत्रणा मूग गिळून आहे. आकोट तालुक्यातील वांझोटे केळी रोपेप्रकरणी शेतकरी चार आठवड्यांपासून कृषी विभाग, जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत. न्यायासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटले, थेट पुणे गाठून कृषी आयुक्तांना साकडे घातले; मात्र परिणाम शून्य. या प्रकरणाच्या निमित्ताने शासकीय यंत्रणांचा असंवेनदशील; किंबहुना भ्रष्ट बुरखाच टराटरा फाडला गेला. एवढंच काय, नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेले राजकीय नेते, सामाजिक संघटना, तसेच शेतकरी नेत्यांची या मुद्यावरील चुप्पी बरंच काही सांगून गेली. अशा स्थितीतही एकाकी झुंज देणार्‍या शेतकर्‍यांच्या जिद्दीला सलामच करावा लागेल. आकोट तालुक्यातील आंबोडा येथील शेतकर्‍यांनी बोगस केळी रोपे देऊन त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार कृषी विभागाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिली. एरव्ही शेतकर्‍यांच्या मुद्यावर आपण कमालीचे संवेदनशील असल्याचे भासवणार्‍या सर्वच यंत्रणांनी या गंभीर मुद्यावर केवळ कागदी घोडे नाचविले. अनेक प्रकरणांमध्ये पोलीस केवळ दस्तावेज व जुजबी चौकशी करून फसवणुकीचे गुन्हे दाखल करतात. शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल, प्रत्येक शेतकर्‍याचे उत्पन्न किती बुडाले याचा तपशील उपलब्ध आहे. बोगस रोपं घेतल्याच्या पावत्याही शेतकर्‍यांकडे आहेत; मात्र शेतकर्‍यांच्या तक्रारीवर वजन नसल्याने गुन्हा तर दाखल होऊच शकला नाही, पण त्यांच्या मदतीसाठी कुणी पुढे येण्याची तसदीही घेतली नाही.एकीकडे शेतकर्‍यांचा जगाचा पोशिंदा म्हणून उल्लेख करायचा आणि दुसरीकडे तो उपेक्षित कसा राहिला, पाय घासून कसा मरेल, अशी परिस्थिती निर्माण करायची, असेच चित्र या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून येते. शासकीय यंत्रणांचे आणि कृषी क्षेत्राशी निगडित काही कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध यापूर्वी अनेक प्रकरणांच्या निमित्ताने उजेडात आले आहेत. हे आर्थिक हितसंबंध एवढे घट्ट आहेत, की त्यासमोर शेतकर्‍यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तरी अधिकार्‍यांना पर्वा नसते. शेतकर्‍यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर शासकीय यंत्रणा, राजकीय तथा शेतकरी नेते व सामाजिक संघटना जेव्हा डोळेझाक करतात, तेव्हा संवेदनशील मन खिन्न व अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. ही परिस्थिती वेळीच बदलली नाही, तर येणार्‍या काळात शेतकरी हातात रुमणे घेऊन रस्त्यावर उतरेल, एवढे मात्र निश्‍चित..!