शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST

संजय उमक मूर्तिजापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तरीही काही शेतकऱ्यांना ...

संजय उमक

मूर्तिजापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तरीही काही शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यात गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत येत असतानाच अति पाऊस व अवकाळी पावसामुळे पिंकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यावेळी प्रशासनामार्फत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानाचे पंचनामेही केले होते. शासनाच्या सूचनेनुसार हजारो शेतकऱ्यांनी नुकसानाचे अर्ज कृषी विभागाच्या तालुका कार्यालयात जमा केले होते. तसेच अंतिम पैसेवारीही ५० पैशांच्या आत होती. त्यामुळे पीकविमा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाल्यानंतरही संरक्षित पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

---------------------------

१५ जुलै अंतिम मुदत

प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेमध्ये सहभागाची अंतिम तारीख १५ जुलैपर्यंत असली तरी शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत बँकेत जाऊन स्वत:चे घोषणापत्र व संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

-------------------------

बॅंक भरणार विम्याचा हप्ता

ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे पीक कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा हप्ता सेवा सहकारी सोसायटीमार्फत बॅंक भरणार आहे. या हप्त्याचा परतावा कर्जाची रक्कम भरते वेळ बॅंकेत जमा करणे अनिवार्य असणार आहे. जर मुदतीपूर्वी भरणा परतावा केला नाही, तर याही पैशाला व्याज दर आकारण्यात येणार आहे. परंतु सद्य:स्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. यासाठी केवळ शेतकऱ्यांनी आधारकार्ड व सातबारा बॅंकेकडे मुदतीच्या आत जमा करणे आवश्यक आहे.

-----------------

गतवर्षी सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. कुठल्याही विमा कंपनीचा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी बांधावर पोहोचला नाही. यात विमा कम्पन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. यावर्षी विमा काढावा, की नाही, अशी द्विधा मन:स्थितीत आहे.

-रूपराव रामरावजी मेहरे, शेतकरी, सिरसो

----------------------

विमा कंपनीने रॅन्डम प्लॉटपाडून सोयाबीन उत्पन्न जास्त झाल्याचे सांगून विमा नाकारला. या प्लॉटची यादी कंपनीकडे मागितली, तर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. विमा अद्यापही मिळाला नाही. याबाबत कंपनीशी संपर्क केला, तर केंद्र शासनाकडूनच पैसा उपलब्ध नसल्याचे सांगितल्या जाते. विमा काढणे गरजेचे असून, त्यात शेतकऱ्याचा फायदाच होईल.

- राजू वानखडे, शेतकरी, जांभा

--------------------

गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. या सर्व शेतकऱ्यांना मूग, उडीद, तूर या पिकांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे. कपाशीचा विमा केवळ शेलू बाजार, कुरुम, माना, लाखपुरी या सर्कलला मिळाला, सोयाबीन विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत पीकविमा भरावा.

-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर