शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST

संजय उमक मूर्तिजापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तरीही काही शेतकऱ्यांना ...

संजय उमक

मूर्तिजापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तरीही काही शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यात गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत येत असतानाच अति पाऊस व अवकाळी पावसामुळे पिंकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यावेळी प्रशासनामार्फत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानाचे पंचनामेही केले होते. शासनाच्या सूचनेनुसार हजारो शेतकऱ्यांनी नुकसानाचे अर्ज कृषी विभागाच्या तालुका कार्यालयात जमा केले होते. तसेच अंतिम पैसेवारीही ५० पैशांच्या आत होती. त्यामुळे पीकविमा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाल्यानंतरही संरक्षित पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

---------------------------

१५ जुलै अंतिम मुदत

प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेमध्ये सहभागाची अंतिम तारीख १५ जुलैपर्यंत असली तरी शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत बँकेत जाऊन स्वत:चे घोषणापत्र व संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

-------------------------

बॅंक भरणार विम्याचा हप्ता

ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे पीक कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा हप्ता सेवा सहकारी सोसायटीमार्फत बॅंक भरणार आहे. या हप्त्याचा परतावा कर्जाची रक्कम भरते वेळ बॅंकेत जमा करणे अनिवार्य असणार आहे. जर मुदतीपूर्वी भरणा परतावा केला नाही, तर याही पैशाला व्याज दर आकारण्यात येणार आहे. परंतु सद्य:स्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. यासाठी केवळ शेतकऱ्यांनी आधारकार्ड व सातबारा बॅंकेकडे मुदतीच्या आत जमा करणे आवश्यक आहे.

-----------------

गतवर्षी सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. कुठल्याही विमा कंपनीचा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी बांधावर पोहोचला नाही. यात विमा कम्पन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. यावर्षी विमा काढावा, की नाही, अशी द्विधा मन:स्थितीत आहे.

-रूपराव रामरावजी मेहरे, शेतकरी, सिरसो

----------------------

विमा कंपनीने रॅन्डम प्लॉटपाडून सोयाबीन उत्पन्न जास्त झाल्याचे सांगून विमा नाकारला. या प्लॉटची यादी कंपनीकडे मागितली, तर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. विमा अद्यापही मिळाला नाही. याबाबत कंपनीशी संपर्क केला, तर केंद्र शासनाकडूनच पैसा उपलब्ध नसल्याचे सांगितल्या जाते. विमा काढणे गरजेचे असून, त्यात शेतकऱ्याचा फायदाच होईल.

- राजू वानखडे, शेतकरी, जांभा

--------------------

गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. या सर्व शेतकऱ्यांना मूग, उडीद, तूर या पिकांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे. कपाशीचा विमा केवळ शेलू बाजार, कुरुम, माना, लाखपुरी या सर्कलला मिळाला, सोयाबीन विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत पीकविमा भरावा.

-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर