शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:45 IST

अकोला : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, नाफेडद्वारे तूर खरेदी व देयके सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारीत शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि संपूर्ण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेचा मोर्चा कर्जमाफीचा शासनाकडे सादर केला प्रस्तावप्रस्तावाचा विचार करा; अन्यथा ३ सप्टेंबर रोजी उपोषण!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, नाफेडद्वारे तूर खरेदी व देयके सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारीत शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि संपूर्ण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, नाफेडद्वारे तूर खरेदी व तूर खरेदीची देयके सुरळीत करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. निवेदनात शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या मोर्चात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, सतीश देशमुख, ललित बहाळे, डॉ. श्रीकांत तिडके, प्रशांत गावंडे, अविनाश नाकट, विजय लोडम, विजय मोरे, ज्योत्स्ना बहाळे, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील, मनोज तायडे, विजय देशमुख, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब तायडे, गुलाबराव म्हसाये, लक्ष्मीकांत कौठकर, प्रफुल्ल बदरके, मोहंमद साजिदभाई, अरविद तायडे, रवींद्र ठाकरे, शरद सरोदे, पंकज वानखडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते व जिल्हय़ातील शेतकरी सहभागी झाले होते.

..तर सत्ताधारी पुढार्‍यांना विचारला जाणार जाब! शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रस्तावावर शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, जेथे-जेथे सत्ताधारी पुढार्‍यांच्या सभा होतील तेथे-तेथे त्यांना संपूर्ण कर्जमाफीबाबत जाब विचारला जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.

प्रस्तावाचा विचार करा; अन्यथा ३ सप्टेंबर रोजी उपोषण!शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासंदर्भात शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या प्रस्तावावर शासनाने गांभीर्याने विचार करावा; अन्यथा ३ सप्टेंबर रोजी (शरद जोशी यांची जयंती) राज्यात शेतकरी एक दिवस उपोषण करणार असून, शासनाच्या शेतीविरोधी भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे, असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.