शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

शेतक-यांचे ‘अर्थचक्र’ बिघडले!

By admin | Updated: May 7, 2017 02:50 IST

तूर खरेदीचा गोंधळ; अकोल्यातील स्थिती; हमी दराने खरेदी बंद, व्यवहार कोलमडले!.

संतोष येलकरअकोला : हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, निम्म्यापेक्षा अधिक तूर शेतकर्‍यांच्या घरातच पडून आहे, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याच्या स्थितीत शेतीच्या मशागतीसह तूर उत्पादक शेतकर्‍यांचे सर्वच व्यवहार कोलमडले आहेत. त्यानुषंगाने तूर खरेदीच्या वांद्यात तूर उत्पादक शेतकर्‍यांचे ह्यअर्थचक्रह्ण बिघडले आहे.हमी दराने ह्यनाफेडह्णमार्फत तूर खरेदी गत २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील ह्यनाफेडह्णच्या खरेदी केंद्रांवर तुरीचे मोजमाप बाकी असलेल्या तुरीची खरेदी करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आलेल्या तुरीचे पंचनामे करून, शासनामार्फत तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु नाफेडद्वारे तूर खरेदीत मोजमापासाठी प्रचंड विलंब झाल्याने, बहुतांश तूर उत्पादक शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रांवर तूर विकण्यासाठी आणणे टाळले. २२ एप्रिलपासून हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात व्यापार्‍यांकडून तुरीला प्रती क्विंटल ३ हजार ८00 ते ३ हजार ९00 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने, निम्म्यापेक्षा अधिक तूर अद्याप तूर शेतकर्‍यांच्या घरातच पडून आहे. त्यामुळे तूर विकल्यानंतर मिळणार्‍या पैशातून शेतीच्या मशागतीसह बियाणे-खतांची खरेदी, मजुरांची मजुरी व पेरणीचा खर्च भागविण्याचे तूर उत्पादक शेतकर्‍यांनी केलेले नियोजन कोलमडले आहे, तसेच पैसा नसल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याच्या स्थितीत मुला-मुलींचे लग्न लांबणीवर टाकण्यासह शेतकर्‍यांच्या सर्वच व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तूर खरेदीने तूर उत्पादक शेतकर्‍यांचे ह्यअर्थचक्रह्ण बिघडल्याची स्थिती अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात असल्याचे वास्तव आहे.बँकेचे कर्ज कसे भरणार, पेरणीचा खर्च कसा भागवणार?तूर घरातच पडून असून, पावसाळा तोंडावर आला आहे; मात्र जवळ पैसा नसल्याच्या स्थितीत शेतीची मशागत, बियाणे-खतांची खरेदी, बँकेच्या कर्जाचा भरणा कसा करणार आणि खरीप पेरणीचा खर्च कसा भागवणार, असा प्रश्न या शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.शेतकर्‍यांना "अच्छे दिन" केव्हा येणार? हमी दराने तुरीची खरेदी बंद करण्यात आली. बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर घरातच पडून आहे. त्यामुळे तूर विकल्यानंतर मिळणार्‍या पैशातून करावयाच्या व्यवहाराचे नियोजन कोलमडले आहे. पैसा नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना ह्यअच्छे दिनह्ण केव्हा येणार, असा प्रश्न तूर उत्पादक शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात आली. बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर घरातच ठेवल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला तरी, जवळ पैसा नसल्याने, शेतीची मशागत, पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, मुला-मुलींचे लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे.- विनोद बिलबिले तूर उत्पादक शेतकरी, कान्हेरी गवळी.तुरीचे उत्पादन चांगले झाले; मात्र हमी दराने खरेदी बंद आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, तूर उत्पादक शेतकर्‍यांचे सर्वच आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.-संजय वैराळेतूर उत्पादक शेतकरी, बोरगाव वैराळे.हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात आली. बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे पैसा नसल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतीची मशागत, पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेच्या कर्जाचा भरणा, गहाण ठेवलेले दागिने सोडणे व इतर व्यवहारांवर परिणाम झाला आहे.- विलास दांदळेतूर उत्पादक शेतकरी, खिरपुरी बु.हमी दराची तूर खरेदी बंद असून, बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, निम्म्यापेक्षा अधिक तूर शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे तुरीचे चांगले उत्पादन घेऊन, शेतकर्‍यांना फायदा झाला नाही. तूर विकण्याची चिंता असल्याने, खरीप पेरणी, बियाणे-खते खरेदीसाठी पैसा कोठून आणणार आणि बँकेच्या पीक कर्जाचा भरणा कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- नीलेश हाडोळेतूर उत्पादक शेतकरी, उमरी-अकोला.