शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शेतकऱ्यांनो; पेरणीची घाई नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST

अकोला : विदर्भात १० ते १३ जूनदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर बियाणे न उगवण्याचा ...

अकोला : विदर्भात १० ते १३ जूनदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर बियाणे न उगवण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागामार्फत गुरुवारी देण्यात आला.

पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; परंतु १० ते १३ जूनदरम्यान विदर्भात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर पेरलेले बियाणे जमिनीत दबण्याची किंवा वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरलेले बियाणे न उगवण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे न उगवण्याचा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची घाई करू नये, १७ जूननंतर पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागामार्फत देण्यात आला आहे.

...तर दुबार पेरणीचे संकट!

१० ते १३ जूनदरम्यान विदर्भात वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता नागपूर येथील हवामान विभागाने वर्तविली आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर पेरणी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

--------------------------

१० ते १३ जूनदरम्यान, विदर्भात वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर पेरणी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी पेरणीची घाई न करता १७ जूनपर्यंत पेरणी करण्याचे टाळावे.

-शंकर तोटावार,

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.