शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

कृषी प्रयोगांमुळे मेळघाटात शेतकरी आत्महत्या नाहीत - कोल्हे

By admin | Updated: May 2, 2016 02:19 IST

मेळघाटात सामूहिक प्रयत्नातून शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त.

अकोला: महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या क्लेशदायक आहेत; परंतु आमच्या मेळघाटात सामूहिकतेने केलेल्या प्रयत्नांमधून आम्ही एकही शेतकर्‍याची आत्महत्या होऊ दिली नाहीत. मेळघाटात आदिवासी शेतकर्‍यांना सोबत घेऊन विविधांगी कृषी प्रयोग राबविले. १९९0 पासून आम्ही शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊन सोयाबीन, ज्यूट, हळदीचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यानंतर आम्ही डेहरादूनवरून बटाटा आणला. कापूस लागवड केली. ती यशस्वी झाली. विशेष म्हणजे, लेबर ओरिएन्टेड शेती आम्ही केली नाही. वर्षभर आदिवासी शेतकर्‍यांच्या हातात पैसा खेळत राहतो. त्यामुळेच मेळघाट आत्महत्यामुक्त आहे. अशी माहिती वैरागड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिली. अकोल्यात रविवारी एका कार्यक्रमासाठी डॉ. कोल्हे आले असता, त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मेळघाट हा परिसर विशेषत: कुपोषणासाठी ओळखला जातो. येथील महिला व पुरुषांमध्ये प्रचंड व्यसनाधीनता होती. ती आता कमी झाली आहे. शासनाने आरोग्य योजना राबविल्या; परंतु त्याला र्मयादा आहेत. अनेक योजना आदिवासी बांधवापर्यंत पोहोचत नाहीत. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेलं हे गाव जेमतेम दोन हजार वस्तीचं. धारणी-वैरागड असा प्रवास. पावसाळ्यात धारणीच्या पुढे रस्ते बंद . ४0 कि.मी. अंतर पायी चालत वैरागड गाठावं लागतं. या भागाकडे शासनाचं दुर्लक्ष. रस्ते नाहीत, वीज नाही; मग शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आवश्यक सुविधांविषयी तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी आम्ही आदिवासी बांधवांच्या मदतीने परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.