शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कृषी प्रयोगांमुळे मेळघाटात शेतकरी आत्महत्या नाहीत - कोल्हे

By admin | Updated: May 2, 2016 02:19 IST

मेळघाटात सामूहिक प्रयत्नातून शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त.

अकोला: महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या क्लेशदायक आहेत; परंतु आमच्या मेळघाटात सामूहिकतेने केलेल्या प्रयत्नांमधून आम्ही एकही शेतकर्‍याची आत्महत्या होऊ दिली नाहीत. मेळघाटात आदिवासी शेतकर्‍यांना सोबत घेऊन विविधांगी कृषी प्रयोग राबविले. १९९0 पासून आम्ही शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊन सोयाबीन, ज्यूट, हळदीचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यानंतर आम्ही डेहरादूनवरून बटाटा आणला. कापूस लागवड केली. ती यशस्वी झाली. विशेष म्हणजे, लेबर ओरिएन्टेड शेती आम्ही केली नाही. वर्षभर आदिवासी शेतकर्‍यांच्या हातात पैसा खेळत राहतो. त्यामुळेच मेळघाट आत्महत्यामुक्त आहे. अशी माहिती वैरागड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिली. अकोल्यात रविवारी एका कार्यक्रमासाठी डॉ. कोल्हे आले असता, त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मेळघाट हा परिसर विशेषत: कुपोषणासाठी ओळखला जातो. येथील महिला व पुरुषांमध्ये प्रचंड व्यसनाधीनता होती. ती आता कमी झाली आहे. शासनाने आरोग्य योजना राबविल्या; परंतु त्याला र्मयादा आहेत. अनेक योजना आदिवासी बांधवापर्यंत पोहोचत नाहीत. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेलं हे गाव जेमतेम दोन हजार वस्तीचं. धारणी-वैरागड असा प्रवास. पावसाळ्यात धारणीच्या पुढे रस्ते बंद . ४0 कि.मी. अंतर पायी चालत वैरागड गाठावं लागतं. या भागाकडे शासनाचं दुर्लक्ष. रस्ते नाहीत, वीज नाही; मग शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आवश्यक सुविधांविषयी तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी आम्ही आदिवासी बांधवांच्या मदतीने परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.