शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

कृषी प्रयोगांमुळे मेळघाटात शेतकरी आत्महत्या नाहीत - कोल्हे

By admin | Updated: May 2, 2016 02:19 IST

मेळघाटात सामूहिक प्रयत्नातून शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त.

अकोला: महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या क्लेशदायक आहेत; परंतु आमच्या मेळघाटात सामूहिकतेने केलेल्या प्रयत्नांमधून आम्ही एकही शेतकर्‍याची आत्महत्या होऊ दिली नाहीत. मेळघाटात आदिवासी शेतकर्‍यांना सोबत घेऊन विविधांगी कृषी प्रयोग राबविले. १९९0 पासून आम्ही शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊन सोयाबीन, ज्यूट, हळदीचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यानंतर आम्ही डेहरादूनवरून बटाटा आणला. कापूस लागवड केली. ती यशस्वी झाली. विशेष म्हणजे, लेबर ओरिएन्टेड शेती आम्ही केली नाही. वर्षभर आदिवासी शेतकर्‍यांच्या हातात पैसा खेळत राहतो. त्यामुळेच मेळघाट आत्महत्यामुक्त आहे. अशी माहिती वैरागड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिली. अकोल्यात रविवारी एका कार्यक्रमासाठी डॉ. कोल्हे आले असता, त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मेळघाट हा परिसर विशेषत: कुपोषणासाठी ओळखला जातो. येथील महिला व पुरुषांमध्ये प्रचंड व्यसनाधीनता होती. ती आता कमी झाली आहे. शासनाने आरोग्य योजना राबविल्या; परंतु त्याला र्मयादा आहेत. अनेक योजना आदिवासी बांधवापर्यंत पोहोचत नाहीत. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेलं हे गाव जेमतेम दोन हजार वस्तीचं. धारणी-वैरागड असा प्रवास. पावसाळ्यात धारणीच्या पुढे रस्ते बंद . ४0 कि.मी. अंतर पायी चालत वैरागड गाठावं लागतं. या भागाकडे शासनाचं दुर्लक्ष. रस्ते नाहीत, वीज नाही; मग शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आवश्यक सुविधांविषयी तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी आम्ही आदिवासी बांधवांच्या मदतीने परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.