शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

रब्बी पीक विम्यातही शेतक-यांची निराशा

By admin | Updated: February 2, 2016 01:51 IST

दुष्काळात पीक नुकसानभरपाईचा लाभ अत्यल्प.

संतोष येलकर/अकोला: गतवर्षीच्या रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकाच्या नुकसानभरपाईपोटी शेतकर्‍यांना देण्यात येत असलेल्या विमा रकमेचा लाभ अत्यल्प असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक विम्यातही शेतकर्‍यांची निराशा झाली आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीदेखील अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये दुष्कळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतकरी हवालदिल झाला. गतवर्षीच्या रब्बी हंगामात अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी प्रामुख्याने हरभरा, गहू, कांदा व इतर पिकांचा विमा काढला होता. पीक विमा हप्त्याची रक्कम भरून, राष्ट्रीय कृषी विमा कंपनीकडून शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला. दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक नुकसानभरपाईपोटी पीक विमा रकमेचा आधार मिळेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी पीक विम्याची रक्कम अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विमा कंपनीमार्फत संबंधित बँकांना प्राप्त झाली. अकोला जिल्ह्यात हरभरा पीक विम्यापोटी एकरी ५८१ रुपये ते २ हजार ९५४ रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. महसूल मंडळनिहाय देण्यात येणार्‍या पीक नुकसानभरपाईमध्ये काही तालुक्यांमध्ये पीक विम्याची अत्यल्प रक्कम प्राप्त झाली आहे. अशीच स्थिती विभागातील इतर जिल्ह्यांमध्येही आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत हरभरा पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांनी एकरी ३00 रुपये प्रमाणे विमा हप्त्याची रक्कम भरली असून, त्यापोटी एकरी ५८१ रुपये ते २ हजार ९५४ रुपयांपर्यंंत पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक विम्यापोटी कमी रकमेचा लाभ मिळल्याने, शेतकर्‍यांची निराशा झाली आहे.