शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सावरगाव येथे अतिवृष्टीच्या लाभापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:18 IST

वसाली, पांगरताटी, झरंडी, सावरगाव या चार गावांचा प्रभार तलाठी तौफिक अहमद यांच्याकडे असून सावरगाव मुख्यालय आहे; परंतु तलाठी ...

वसाली, पांगरताटी, झरंडी, सावरगाव या चार गावांचा प्रभार तलाठी तौफिक अहमद यांच्याकडे असून सावरगाव मुख्यालय आहे; परंतु तलाठी कार्यालयच उघडत नाही. २०२० च्या सप्टेंबर महिन्यामध्ये सावरगाव परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये जवळपास ७ ते ८० ग्रामस्थांची घरे कोसळली होती. काही लाभार्थींना लाभ मिळाला; परंतु काहींचे खाते क्रमांक तलाठ्यांनी चुकीचे दिल्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तसेच फेरफार नोंदी, वारसाच्या नोंदी, विहिरी व बोअरवेल आदी नोंदी प्रलंबित आहेत. तलाठी गावात येत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेकडून कर्जासाठी लागणारी कागदपत्रे मिळत नसल्याने शेतकरी बँकेच्या कर्जापासून वंचित आहेत. शेतकरी विविध कामांसाठी सावरगाव येथे तलाठी कार्यालयावर सकाळपासून सायंकाळपर्यंत ताटकळत तलाठ्याच्या प्रतीक्षेत बसतात; परंतु तलाठी येत नसल्याने तसेच शेतकरी कामाविना घरी परततात विविध कामासाठी शेतकरी तलाठ्यास संपर्क करतात; परंतु त्यांचा नेहमी फोन बंद असतो. याबाबत ग्रामस्थांनी पातूरचे तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

तलाठ्याची मुजोरी, शेतकरी त्रस्त

पावसाळ्यापूर्वी शेतकरी पेरणीसाठी खत, बियाणे, खरेदी करण्यासाठी बँकेतून कर्ज काढतात त्यासाठी तलाठ्याकडून कागदपत्रे लागतात; परंतु तलाठी गावात येत नसल्याने शेतकरी कागदपत्रांपासून वंचित आहे. पावसाळा येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला तरी तलाठ्याकडून कागदपत्रे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया

तलाठ्यांनी चुकीचा खाते क्रमांक दिल्याने मी अतिवृष्टीच्या लाभापासून गेल्या सात महिन्यांपासून वंचित आहे. याबाबत तलाठ्यास विचारले असता, ते सांगतात तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा, तहसील कार्यालयातील कर्मचारी तलाठ्यांना विचारा, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देतात.