शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा लढा कायम!

By admin | Updated: May 16, 2017 02:16 IST

शिवसेना शिवसंपर्क अभियान : उद्धव ठाकरे यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जाच्या खाईत बुडालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा कायम सुरू राहील. तुम्ही हताश होऊ नका, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे सांगत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव देणे तर सोडाच त्यांच्या तुरीची खरेदी करण्यास सरकार जाणीवपूर्वक आखडता हात घेत असल्याचे सांगत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कैफियत मांडली. शिवसंपर्क अभियानच्या निमित्त अकोल्यात दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी स्थानिक विश्रामगृह येथे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी दाखल झाले होते. ठाकरे यांचे आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी अकोट, बाळापूर, पातूर तसेच अकोला तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणलेला सुताचा हार भेट म्हणून देताच ठाकरे यांनी नतमस्तक होऊन हार स्वीकारला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांची नावे लिहून घेतली. याप्रसंगी संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत, आ. गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महादेवराव गवळे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले... आम्ही सरकारमध्ये भाजपच्या सोबत असलो तरी तुमच्या समस्यांवर तोडगा निघत नसेल तर आमचा सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध राहील आणि आहे. तूर खरेदीवरून सरकारने मारलेल्या कोलांटउड्या पाहता एकप्रकारे चेष्टा करण्यात आल्याचे दिसून येते. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या समस्या जोपर्यंत निकाली निघणार नाहीत तोपर्यंत सरकारला झोपू देणार नसल्याचे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.या शेतकऱ्यांनी साधला संवादअकोला तालुक्यातून म्हैसांग येथून मोहन काळे, रामकृष्ण साटोटे, अजित देशमुख, ज्ञानेश्वर गावंडे, पातूर नंदापूर येथून गिरीश गवळी, आगर येथील पंकज काळणे तसेच पातूर तालुक्यातील गजानन घुले, भारत अंभोरे, दत्तराव घुगे, दशरथ आढोळकर, रामदास आढोळकर, रामदास बोडणे, रमेश लाडकर, कन्नू पांडे तसेच बाळापूर तालुक्यातील विनायक लोड, गोवर्धन करनकर, डिगांबर शिंदे, वसंत नागे, नारायण लोड, आनंद थोरात यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला. काय म्हणाले शेतकरी?शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतीच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता; परंतु ज्या पद्धतीने भाजप सरकारने तूर खरेदी करताना शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे सोयाबीन, तूर घरात पडून आहे. कांद्याच्या पेरणीला लागलेला खर्च व मिळालेला भाव पाहता नाइलाजाने कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. अघोषित भारनियमनामुळे सिंचनावर परिणाम झाल्याची समस्या शेतकऱ्यांनी मांडली.शेतकऱ्यांची निवड करा!येत्या १९ मे रोजी नाशिक येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातून तीन शेतकऱ्यांची निवड करण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिला.