शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा लढा कायम!

By admin | Updated: May 16, 2017 02:16 IST

शिवसेना शिवसंपर्क अभियान : उद्धव ठाकरे यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जाच्या खाईत बुडालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा कायम सुरू राहील. तुम्ही हताश होऊ नका, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे सांगत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव देणे तर सोडाच त्यांच्या तुरीची खरेदी करण्यास सरकार जाणीवपूर्वक आखडता हात घेत असल्याचे सांगत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कैफियत मांडली. शिवसंपर्क अभियानच्या निमित्त अकोल्यात दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी स्थानिक विश्रामगृह येथे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी दाखल झाले होते. ठाकरे यांचे आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी अकोट, बाळापूर, पातूर तसेच अकोला तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणलेला सुताचा हार भेट म्हणून देताच ठाकरे यांनी नतमस्तक होऊन हार स्वीकारला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांची नावे लिहून घेतली. याप्रसंगी संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत, आ. गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महादेवराव गवळे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले... आम्ही सरकारमध्ये भाजपच्या सोबत असलो तरी तुमच्या समस्यांवर तोडगा निघत नसेल तर आमचा सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध राहील आणि आहे. तूर खरेदीवरून सरकारने मारलेल्या कोलांटउड्या पाहता एकप्रकारे चेष्टा करण्यात आल्याचे दिसून येते. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या समस्या जोपर्यंत निकाली निघणार नाहीत तोपर्यंत सरकारला झोपू देणार नसल्याचे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.या शेतकऱ्यांनी साधला संवादअकोला तालुक्यातून म्हैसांग येथून मोहन काळे, रामकृष्ण साटोटे, अजित देशमुख, ज्ञानेश्वर गावंडे, पातूर नंदापूर येथून गिरीश गवळी, आगर येथील पंकज काळणे तसेच पातूर तालुक्यातील गजानन घुले, भारत अंभोरे, दत्तराव घुगे, दशरथ आढोळकर, रामदास आढोळकर, रामदास बोडणे, रमेश लाडकर, कन्नू पांडे तसेच बाळापूर तालुक्यातील विनायक लोड, गोवर्धन करनकर, डिगांबर शिंदे, वसंत नागे, नारायण लोड, आनंद थोरात यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला. काय म्हणाले शेतकरी?शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतीच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता; परंतु ज्या पद्धतीने भाजप सरकारने तूर खरेदी करताना शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे सोयाबीन, तूर घरात पडून आहे. कांद्याच्या पेरणीला लागलेला खर्च व मिळालेला भाव पाहता नाइलाजाने कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. अघोषित भारनियमनामुळे सिंचनावर परिणाम झाल्याची समस्या शेतकऱ्यांनी मांडली.शेतकऱ्यांची निवड करा!येत्या १९ मे रोजी नाशिक येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातून तीन शेतकऱ्यांची निवड करण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिला.