शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकरी संवाद यात्रा उद्या पासून तेल्हार्‍यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:33 IST

तेल्हारा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून ९ सप्टेंबर रोजी  सुरू होणारी ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0, ११ सप्टेंबरला  अकोला जिल्ह्यात येत असून, या अराजकीय यात्रेत  सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  यात्रेचे जिल्हा संयोजक अनिल गावंडे यांनी शुक्रवारी  पत्रकार परिषदेत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून ९ सप्टेंबर रोजी  सुरू होणारी ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0, ११ सप्टेंबरला  अकोला जिल्ह्यात येत असून, या अराजकीय यात्रेत  सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  यात्रेचे जिल्हा संयोजक अनिल गावंडे यांनी शुक्रवारी  पत्रकार परिषदेत केले.येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी गावंडे  बोलत होते. १0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता  यात्रेचे तेल्हारा तालुक्यात अडसूळ फाटा येथे आगमन  होत असून, सकाळी ११.३0 दहीगाव, दुपारी १२.४५  थार, २ वाजता गाडेगाव, २.४५ बेलखेड, ४.४५ चि तलवाडी, ५.४५ ला अडगाव बु., सायंकाळी ७ ला  सिरसोली आणि रात्री ९ वाजता अकोट येथे सरपंच  संघटना पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहे. ११ स प्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता पिंप्री खुर्द, दुपारी १२  बोर्डी, २ वाजता वडगाव मेंढे, २.३0 देऊळगाव, ३  वाजता सावरा आणि दुपारी ४ वाजता आसेगाव बाजार  येथे संवाद यात्रा पोहोचणार आहे, अशी माहिती गावंडे  यांनी दिली. अनिल गावंडे पुढे म्हणाले, की आम्ही  संवाद यात्रेद्वारे विदर्भातील पाच जिल्ह्यांतील किमान  ५0 गावांचे आणि गावकरी लोकांचे प्रश्न समजून  घेणार आहोत आणि यात्रा संपल्यावर ते सर्व प्रश्न  सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रामाणिक प्रयत्न  करणार आहोत, असे ते म्हणाले.  यावेळी  सामाजिक  कार्यकर्ते पुरुषोत्तम आवारे, पत्रकार सुधाकर खुमकर  यांनी शेतकरी संवाद यात्रेत कुणीही हारतुरे आणू नये  आणि कोणतेही राजकीय झेंडे घेऊन सामील होऊ नये,  असे आवाहन केले. पत्रपरिषदेला गजानन बोरोकार,  मनीष भांबुरकर, अशोक घाटे आदी उपस्थित होते.