शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनात शेती गेल्याने शेतकरी झाला शेतमजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:57 IST

अकोट तालुक्याच्या शिवपूर येथील रामदास राऊत या शेतकर्‍याची व्यथा धर्मा पाटलासारखीच आहे. राऊत यांच्या दहा एकर शेतीचे भूसंपादन करून त्यांना अवघा ५ लाख ३0 हजारांचा मोबदला देण्यात आला व त्यांना भूमिहीन करण्यात आले आहे. त्यांनी कमी मोबदला मिळाल्याचा आक्षेप घेतल्यावर शासनाने अधिक मोबदला, ई-क्लासची शेती व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचे आश्‍वासन दिले; मात्र या आश्‍वासनाची पूर्तता न झाल्याने राऊत यांची परवड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देसाडेदहा एकराचे मिळाले ५ लाख अकोटचे रामदास राऊत हे शेतकरी धर्मा पाटलांच्या मार्गावर

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट (जि.आकोला) : शासनाकडून भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने धर्मा पाटील या शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळल्याचे प्रकरण सध्या ताजे असतानाच असे अनेक धर्मा पाटील राज्यभरात न्यायासाठी सरकारी उंबरठे झिजवताना दिसत आहेत. अकोल्यातील अकोट तालुक्याच्या शिवपूर येथील रामदास राऊत या शेतकर्‍याची व्यथा धर्मा पाटलासारखीच आहे. राऊत यांच्या दहा एकर शेतीचे भूसंपादन करून त्यांना अवघा ५ लाख ३0 हजारांचा मोबदला देण्यात आला व त्यांना भूमिहीन करण्यात आले आहे. त्यांनी कमी मोबदला मिळाल्याचा आक्षेप घेतल्यावर शासनाने अधिक मोबदला, ई-क्लासची शेती व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचे आश्‍वासन दिले; मात्र या आश्‍वासनाची पूर्तता न झाल्याने राऊत यांची परवड सुरू झाली आहे. अकोला जिल्हय़ातील अकोट तालुक्यात शिवपूर कासोद येथे शहापूर लघू पाटबंधारे विभागाच्या वतीने सिंचन प्रकल्प उभारल्या जात आहे. या प्रकल्पाकरिता शिवपूर येथील रामदास राऊत, त्यांची पत्नी बेबीताई व वडील बबन राऊत यांच्या नावे असलेली शेत सर्व्हे गट क्रमांक २३५,२३८ व २२७ मधील १0 एकर ३0 गुंठे जमीन संपादित करण्यात आली. या भूसंपादनाचा निवाडा हा भूसंपादन अधिनियम, १८९४ चे कलम १२ नुसार करण्यात आला. या निवाडाचे आदेश २0 ऑगस्ट २00८ रोजी पारित करण्यात आल्यानंतर राऊत कुटुंबाची १0 एकर ३0 गुंठे सर्व शेती ताब्यात घेत मोबदला म्हणून अवधे ५ लाख ३0 हजार रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे या मोबदल्याच्या रकमेममधून जिल्हा मध्यवर्ती बँकेने ६0 हजार रुपये पीक कर्जाची कपात करून शेतकर्‍याच्या हाती ४ लाख ७0 हजार ठेवले. मोबदल्याची रक्कमसुद्धा दोन टप्प्यात देण्यात आली. अल्प मोबदला मिळत असल्याने तसेच दिलेल्या मोबदल्याच्या रकमेमध्ये एक एकर शेतीसुद्धा विकत मिळत नसल्याने या भूमिहीन शेतकर्‍याने संबंधित भूसंपादन अधिकारी, शहापूर लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता, त्यांना कायदा दुरुस्ती करणे सुरू आहे, त्यामुळे अधिक मोबदला मिळणार, भूमिहीन होत असल्याने ई-क्लासची जमीन तसेच शासकीय सेवेत कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्‍वासन देऊन बोळवण करण्यात आली.गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांना केवळ नोकरीमध्ये प्राधान्य सवलत देणारे  प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र  देण्यात आले. विशेष म्हणजे  धरणाचे फायदे सांगत तत्कालीन अधिकारी वर्गाने भूसंपादनावर आक्षेप घेण्यापासून प्रवृत्तच केले; मात्र आक्षेप नोंदविल्यावर त्या संबंधी आक्षेप नोंदविणारा जाहीरनाम्याबाबतची माहिती कमी खपाच्या वृत्तपत्रांना दिल्याचाही आरोप राऊत यांनी लोकमतशी बोलताना केला आहे. सर्व जमीन संपादित झाल्यामुळे राऊत यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांना मजुरी करावी लागत आहे. कुटुंबात आठ सदस्य असून, एकही शासकीय नोकरीवर नाही. शेती नसल्यामुळे एक मुलगा खासगी नोकरी करतो, तर इतरांवर वेळ मिळेल तशी मजुरी करण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत मानसिक तणावामुळे रामदास राऊत यांचे कुटुंब हताश झाले आहे. अशीच स्थिती भूसंपादनात शेती गेलेल्या इतरही शेतकर्‍यांची झाली आहे. शासनाने राज्यातील धर्मा पाटील यांच्यासारख्या इतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता पुढे येणे गरजेचे झाले आहे.

‘पीएमओ’कडून दखल..‘सीएमओ’कडून बेदखलजमिनीचा मिळालेला अल्प मोबदला, शासकीय नोकरी नाही, त्यामुळे हताश होऊन आत्महत्या करण्याच्या विवंचनेत असलेल्या रामदास राऊत यांना अद्यापही राज्य शासन व अधिकार्‍यांकडून दिलेल्या आश्‍वासनांचा प्रतिसाद मिळत नसल्याने थेट प्रधानमंत्री  कार्यालयात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपली व्यथा कळविली. प्रधानमंत्री  कार्यालयाने राऊत यांच्या पत्राची दखल घेत तत्काळ कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना २१ डिसेंबर २0१७ रोजी कळविले; परंतु अद्यापही प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची दखल घेण्यात आली नाही. 

शेतमालकाचा भूमिहीन, मजूर झालो. अल्प मोबदला दिला. भूसंपादन करताना अनेकांनी लुटले. बँकेनेही सोडले नाही. मोबदल्यामधून भूसंपादन केलेल्या शेतीपैकी अर्धी शेतीही विकत मिळत नाही. दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही. शासनाने जमिनाचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला द्यावा. सध्या मी व माझे कुटुंब मानसिक तणावात आहे. कधी कधी धर्मा पाटीलसारखे मरण आले तरी चालेल; पण न्याय मिळाला पाहिजे, असे डोक्यात येते. - रामदास बबन राऊत, प्रकल्पग्रस्त शेतकरी, शिवपूर

टॅग्स :akotअकोटFarmerशेतकरी