शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादातूनच शेतीची प्रगती - कुलगुरू दाणी खरीप हंगामपूर्व मेळाव्याला वर्‍हाडातील शेतकर्‍यांचा प्रतिसाद

By admin | Updated: May 20, 2014 19:49 IST

शेतकरी-कृषी शास्त्रज्ञांच्या संवादातूनच शेतीच्या प्रगतीकडे वाटचाल करता येणार असून, प्रगतिशील शेतकर्‍यांनी कृषी तंत्रज्ञान व स्वत:च्या अनुभवाची सांगड घालून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी यांनी केले.

अकोला : शेतकरी-कृषी शास्त्रज्ञांच्या संवादातूनच शेतीच्या प्रगतीकडे वाटचाल करता येणार असून, प्रगतिशील शेतकर्‍यांनी कृषी तंत्रज्ञान व स्वत:च्या अनुभवाची सांगड घालून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात मंगळवार २० मे रोजी आयोजित खरीप हंगामपूर्व कृषी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दाणी बोलते होते.मेळाव्याला संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, शिक्षण विस्तार संचालक डॉ. विजय माहोरकर, डॉ. एम.व्ही. भाले, डॉ. सी.एन. गांगडे, प्रगतिशील शेतकरी पंढरी बनकर,कुलदीप राऊत, किशोर बलखंडे,शिक्षण विस्तार संचालनालयाचेप्रमुख संपादक डॉ.प्रमोद वाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. दाणी यांनी शेतकरीच कृषी विद्यापीठाचा मार्गदर्शक व संदेशवाहक असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठ निर्मित संशोधन तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्‍यांनी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी किडीबाबत खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याकरिता पिकावर नवीन कीड दिसताच शेतकर्‍यांनी विलंब न करता, कृषी विद्यापीठांच्या कीटकशास्त्र विभागाशी संपर्क साधावा म्हणजे संभाव्य नुकसान टाळता येईल, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी शेतकर्‍यांनी शेतीत केलेले प्रयोग सादर केले. शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्नाची उत्तरे कृषी शास्त्रज्ञांनी दिली. तांत्रिक सत्रात विविध पीक व पेरणीची माहिती कृषी शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना दिली. या मेळाव्याच्या ठिकाणी कृषी विद्यापीठाचे ५० क्विंटल सोयाबीन बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी केले. तारा तूर, मूग व भाजीपाले बियाणे, निविष्ठा, प्रकाशने विक्रीसाठी ठेवले होते. शेतकर्‍यांनी या सर्वच साहित्य बियाण्यांची खरेदी केली. कृषी विद्यापीठाची १० ते १२ क्विंटल तारा तूर शेतकर्‍यांनी खरेदी केली.-आंतरराष्ट्रीय शेती सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ व पाश्चिमात्य शेतकर्‍यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी येत्या ४ ते १० डिसंेबर रोजी आंतरराष्ट्रीय शेती सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. दाणी यांनी या मेळाव्यात केली. पाश्चिमात्य शेतीतील प्रयोग विदर्भातील शेतकर्‍यांना माहिती व्हावेत, यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचे डॉ. दाणी यांनी सांगितले.