शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

केळी उत्पादकांच्या नुकसानाची कृषिमंत्र्यांकडून कबुली!

By admin | Updated: March 18, 2016 02:13 IST

आमदारांच्या तारांकित प्रश्नावर उत्तर; तपास प्रगतीपथावर असल्याची दिली माहिती.

अकोला : केळीचे निकृष्ट व बोगस बियाणे देऊन आकोट तालुक्यातील केळी उत्पादकांची फसवणूक करण्यात आली असून, यात शेतकर्‍यांचे ७0 टक्के नुकसान झाले असल्याची कबुली राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. आमदार रणधीर सावरकर आणि आ. प्रकाश भारसाकळे यांच्यासह आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात कृषिमंत्र्यांनी केळी उत्पादकांच्या नुकसानाची कबुली दिली.आकोट तालुक्यातील आंबोडा येथील शेतकर्‍यांनी जून ते जुलै २0१५ दरम्यान केळी पिकाची लागवड केली. सदर बियाणे रमेश रामचंद्र आकोटकर यांच्यासह दोघांच्या गणराज केला ग्रुप या दुकानातून घेतले. इंद्रायणी जातीचे बियाणे मिळण्यासाठी त्यांनी आगाऊ बुकिंग केले होते; मात्र इंद्रायणी जातीचे बुकिंग केल्याची पावती असताना दुसर्‍याच कंपनीचे बेणे पुरविण्यात आले. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोला पूर्वचे आमदर रणधीर सावरकर आणि आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना शेतकर्‍यांना केळीची निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविण्यात आल्याने त्यांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तालुकास्तरीय निवारण समितीच्या अहवालात नमूद असल्याचे कृषिमंत्र्यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सांगितले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, तपास प्रगतीपथावर असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.