शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पीक विम्याच्या लाभाविना शेतकरी वा-यावर!

By admin | Updated: May 3, 2016 02:17 IST

खरीप हंगाम तोंडावर आल्याने अकोला जिल्हय़ातील साडेतीन लाखावर शेतक-यांना पीक विम्याची प्रतीक्षा.

संतोष येलकर /अकोलाराष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्हय़ातील ३ लाख ६८ हजार ८२३ शेतकर्‍यांना पीक विमा रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही. यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असली तरी, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेला शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित असताना पीक विम्याच्या लाभाविनाही वार्‍यावर आहे. त्यामुळे पीक विम्याच्या रकमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्हय़ातील ३ लाख ६८ हजार ८२३ शेतकर्‍यांनी खरीप पिकांचा विमा काढला. विमा हप्त्यापोटी शेतकर्‍यांनी १५ कोटी १५ लाख २८ हजार रुपयांची रक्कम राष्ट्रीय कृषी विमा कंपनीकडे जमा केली. ना िपकीमुळे जवळ पैसा नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला असून, येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली; मात्र जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत दुष्काळी मदत अद्याप प्राप्त झाली नाही. शासनाच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांकडून पीक विमा रकमेचा लाभदेखील अद्याप मिळाला नाही. यावर्षीचा पावसाळा वेळेवर सुरू होण्याचा अंदाज हवामान वेधशाळांनी वर्तविला आहे. त्यानुषंगाने यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे.