शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

पीक विम्याच्या लाभाविना शेतकरी वा-यावर!

By admin | Updated: May 3, 2016 02:17 IST

खरीप हंगाम तोंडावर आल्याने अकोला जिल्हय़ातील साडेतीन लाखावर शेतक-यांना पीक विम्याची प्रतीक्षा.

संतोष येलकर /अकोलाराष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्हय़ातील ३ लाख ६८ हजार ८२३ शेतकर्‍यांना पीक विमा रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही. यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असली तरी, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेला शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित असताना पीक विम्याच्या लाभाविनाही वार्‍यावर आहे. त्यामुळे पीक विम्याच्या रकमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्हय़ातील ३ लाख ६८ हजार ८२३ शेतकर्‍यांनी खरीप पिकांचा विमा काढला. विमा हप्त्यापोटी शेतकर्‍यांनी १५ कोटी १५ लाख २८ हजार रुपयांची रक्कम राष्ट्रीय कृषी विमा कंपनीकडे जमा केली. ना िपकीमुळे जवळ पैसा नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला असून, येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली; मात्र जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत दुष्काळी मदत अद्याप प्राप्त झाली नाही. शासनाच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांकडून पीक विमा रकमेचा लाभदेखील अद्याप मिळाला नाही. यावर्षीचा पावसाळा वेळेवर सुरू होण्याचा अंदाज हवामान वेधशाळांनी वर्तविला आहे. त्यानुषंगाने यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे.