शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळावा!

By admin | Updated: March 3, 2015 23:44 IST

कृषी अर्थशास्त्र परिषदेचे संयोजक डॉ. प्रकाश महेंद्रे यांच्याशी बातचित.

राजरत्न सिरसाट/अकोला : आर्थिक संकटातून बाहेर पडायचे असेल, तर शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाची कास धरलीच पाहिजे; त्याच वेळी त्यांच्याकडील शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळणे गरजेचे आहे. यांसह कृषी निविष्ठांचा खर्च कमी करणे या महत्त्वाच्या विषयावर १७ व्या कृषी अर्थशास्त्र परिषदेत देशातील कृषी अर्थशास्त्रज्ञांनी मंथन केले. या संबधीचा ठराव या परिषदेत पारित करण्यात आला असूून, लवकरच तो शासनाला पाठवणार असल्याची माहिती परिषदेचे संयोजक डॉ. प्रकाश महेंद्रे (पुणे) यांनी दिली. अमरावती येथे १ व २ मार्चला राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषद पार पडली. ती आटोपून परतत असताना अकोला येथे डॉ. महेंद्रे यांनी परिषद घेण्यामागील भूमिका ह्यलोकमतह्णशी बातचित करताना मांडली.प्रश्न - कृषी अर्थशास्त्र परिषद घेण्यामागील उद्देश काय?- शेतकर्‍यांना शेती परवडेल, यासाठीचा ताळेबंद तयार करणे, कमी खर्चाच्या शेतीकरिता मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश या परिषदेचा आहे. युवा कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि युवा शेतकर्‍यांना कृषी अर्थशास्त्र विषयाचे आकलन व्हावे, हाही उद्देश आहे.प्रश्न - या परिषदेला किती शास्त्रज्ञ उपस्थित होते?- देशातील १४२ हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित होते. या सर्व कृषी शास्त्रज्ञांनी कृषी अर्थशास्त्राशी निगडित शोधनिबंध सादर केले.प्रश्न - कोणते विषय महत्त्वाचे वाटले?-शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावे हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे. या विषयावर या परिषदेत महत्त्वाची चर्चा झाली. शेतकर्‍यांचा उत्पादनखर्च कमी झाला पाहिजे. बियाणे, खते, कीटकनाशके यावर २२ टक्के खर्च कमी करता येतो. त्यावर मंथन झाले. प्रश्न- खेडी ओस पडत आहेत. मजूर मिळत नाहीत. यासंबधी विचार झाला का?- हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या विषयावर परिषदेत महत्त्वाचे शोधनिबंध तज्ज्ञांनी सादर केले. खेड्यातून मोठय़ा प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत असून, शहरीकरण वेगाने होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कृषिक्षेत्र घटत आहे. त्याचा फटका भविष्यात बसण्याची शक्यता असल्याने खेड्यात प्रक्रिया उद्योग उभारावे लागतील. खेडी स्वयंपूर्ण करावी लागणार आहेत. याकरिता कृषी उद्योग व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. या विषयावर परिषदेत चर्चा होऊन ठराव घेण्यात आले.प्रश्न - शहरात शेती करता येईल का ? - होय. टेरेस गार्डन, किचन गार्डनिंग या संकल्पना पुढे आल्या आहेत. अनेकांनी या पद्धतीने भाजीपाला, फळपिके घेण्यास सुरुवात केली आहे. याला व्यापक स्वरू प प्राप्त व्हावे, यासाठी परिषदेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी शास्त्रज्ञांनी कृषीशी निगडित अनेक महत्त्वाच्या विषयावर उत्कृष्ट शोधनिबंध सादर केले. त्यांचा परिषदेत स्मृतिचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला.