शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळावा!

By admin | Updated: March 3, 2015 23:44 IST

कृषी अर्थशास्त्र परिषदेचे संयोजक डॉ. प्रकाश महेंद्रे यांच्याशी बातचित.

राजरत्न सिरसाट/अकोला : आर्थिक संकटातून बाहेर पडायचे असेल, तर शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाची कास धरलीच पाहिजे; त्याच वेळी त्यांच्याकडील शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळणे गरजेचे आहे. यांसह कृषी निविष्ठांचा खर्च कमी करणे या महत्त्वाच्या विषयावर १७ व्या कृषी अर्थशास्त्र परिषदेत देशातील कृषी अर्थशास्त्रज्ञांनी मंथन केले. या संबधीचा ठराव या परिषदेत पारित करण्यात आला असूून, लवकरच तो शासनाला पाठवणार असल्याची माहिती परिषदेचे संयोजक डॉ. प्रकाश महेंद्रे (पुणे) यांनी दिली. अमरावती येथे १ व २ मार्चला राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषद पार पडली. ती आटोपून परतत असताना अकोला येथे डॉ. महेंद्रे यांनी परिषद घेण्यामागील भूमिका ह्यलोकमतह्णशी बातचित करताना मांडली.प्रश्न - कृषी अर्थशास्त्र परिषद घेण्यामागील उद्देश काय?- शेतकर्‍यांना शेती परवडेल, यासाठीचा ताळेबंद तयार करणे, कमी खर्चाच्या शेतीकरिता मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश या परिषदेचा आहे. युवा कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि युवा शेतकर्‍यांना कृषी अर्थशास्त्र विषयाचे आकलन व्हावे, हाही उद्देश आहे.प्रश्न - या परिषदेला किती शास्त्रज्ञ उपस्थित होते?- देशातील १४२ हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित होते. या सर्व कृषी शास्त्रज्ञांनी कृषी अर्थशास्त्राशी निगडित शोधनिबंध सादर केले.प्रश्न - कोणते विषय महत्त्वाचे वाटले?-शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावे हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे. या विषयावर या परिषदेत महत्त्वाची चर्चा झाली. शेतकर्‍यांचा उत्पादनखर्च कमी झाला पाहिजे. बियाणे, खते, कीटकनाशके यावर २२ टक्के खर्च कमी करता येतो. त्यावर मंथन झाले. प्रश्न- खेडी ओस पडत आहेत. मजूर मिळत नाहीत. यासंबधी विचार झाला का?- हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या विषयावर परिषदेत महत्त्वाचे शोधनिबंध तज्ज्ञांनी सादर केले. खेड्यातून मोठय़ा प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत असून, शहरीकरण वेगाने होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कृषिक्षेत्र घटत आहे. त्याचा फटका भविष्यात बसण्याची शक्यता असल्याने खेड्यात प्रक्रिया उद्योग उभारावे लागतील. खेडी स्वयंपूर्ण करावी लागणार आहेत. याकरिता कृषी उद्योग व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. या विषयावर परिषदेत चर्चा होऊन ठराव घेण्यात आले.प्रश्न - शहरात शेती करता येईल का ? - होय. टेरेस गार्डन, किचन गार्डनिंग या संकल्पना पुढे आल्या आहेत. अनेकांनी या पद्धतीने भाजीपाला, फळपिके घेण्यास सुरुवात केली आहे. याला व्यापक स्वरू प प्राप्त व्हावे, यासाठी परिषदेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी शास्त्रज्ञांनी कृषीशी निगडित अनेक महत्त्वाच्या विषयावर उत्कृष्ट शोधनिबंध सादर केले. त्यांचा परिषदेत स्मृतिचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला.