शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळावा!

By admin | Updated: March 3, 2015 23:44 IST

कृषी अर्थशास्त्र परिषदेचे संयोजक डॉ. प्रकाश महेंद्रे यांच्याशी बातचित.

राजरत्न सिरसाट/अकोला : आर्थिक संकटातून बाहेर पडायचे असेल, तर शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाची कास धरलीच पाहिजे; त्याच वेळी त्यांच्याकडील शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळणे गरजेचे आहे. यांसह कृषी निविष्ठांचा खर्च कमी करणे या महत्त्वाच्या विषयावर १७ व्या कृषी अर्थशास्त्र परिषदेत देशातील कृषी अर्थशास्त्रज्ञांनी मंथन केले. या संबधीचा ठराव या परिषदेत पारित करण्यात आला असूून, लवकरच तो शासनाला पाठवणार असल्याची माहिती परिषदेचे संयोजक डॉ. प्रकाश महेंद्रे (पुणे) यांनी दिली. अमरावती येथे १ व २ मार्चला राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषद पार पडली. ती आटोपून परतत असताना अकोला येथे डॉ. महेंद्रे यांनी परिषद घेण्यामागील भूमिका ह्यलोकमतह्णशी बातचित करताना मांडली.प्रश्न - कृषी अर्थशास्त्र परिषद घेण्यामागील उद्देश काय?- शेतकर्‍यांना शेती परवडेल, यासाठीचा ताळेबंद तयार करणे, कमी खर्चाच्या शेतीकरिता मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश या परिषदेचा आहे. युवा कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि युवा शेतकर्‍यांना कृषी अर्थशास्त्र विषयाचे आकलन व्हावे, हाही उद्देश आहे.प्रश्न - या परिषदेला किती शास्त्रज्ञ उपस्थित होते?- देशातील १४२ हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित होते. या सर्व कृषी शास्त्रज्ञांनी कृषी अर्थशास्त्राशी निगडित शोधनिबंध सादर केले.प्रश्न - कोणते विषय महत्त्वाचे वाटले?-शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावे हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे. या विषयावर या परिषदेत महत्त्वाची चर्चा झाली. शेतकर्‍यांचा उत्पादनखर्च कमी झाला पाहिजे. बियाणे, खते, कीटकनाशके यावर २२ टक्के खर्च कमी करता येतो. त्यावर मंथन झाले. प्रश्न- खेडी ओस पडत आहेत. मजूर मिळत नाहीत. यासंबधी विचार झाला का?- हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या विषयावर परिषदेत महत्त्वाचे शोधनिबंध तज्ज्ञांनी सादर केले. खेड्यातून मोठय़ा प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत असून, शहरीकरण वेगाने होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कृषिक्षेत्र घटत आहे. त्याचा फटका भविष्यात बसण्याची शक्यता असल्याने खेड्यात प्रक्रिया उद्योग उभारावे लागतील. खेडी स्वयंपूर्ण करावी लागणार आहेत. याकरिता कृषी उद्योग व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. या विषयावर परिषदेत चर्चा होऊन ठराव घेण्यात आले.प्रश्न - शहरात शेती करता येईल का ? - होय. टेरेस गार्डन, किचन गार्डनिंग या संकल्पना पुढे आल्या आहेत. अनेकांनी या पद्धतीने भाजीपाला, फळपिके घेण्यास सुरुवात केली आहे. याला व्यापक स्वरू प प्राप्त व्हावे, यासाठी परिषदेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी शास्त्रज्ञांनी कृषीशी निगडित अनेक महत्त्वाच्या विषयावर उत्कृष्ट शोधनिबंध सादर केले. त्यांचा परिषदेत स्मृतिचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला.