शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

‘पालकां’विना शेतकरी ‘पोरका’!

By admin | Updated: November 23, 2014 23:58 IST

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या.

नागेश घोपे/ वाशिमसंपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या चटक्यांनी होरपळून निघत आहे. राज्यातील ३९ हजार १३४ गावांपैकी तब्बल १९ हजार ६९ गावं दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभी आहेत. खरिप बुडाला, आता रब्बी हंगामही हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या भीषण स्थितीत पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने, आपल्या व्यथा मांडण्यासाठी हक्काचा मंत्री नसल्याच्या भावना शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहेत.यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात सरासरीच्या केवळ ७१.९ टक्के पाऊस पडला. ३४ तालुक्यांमध्ये २६ ते ५0 टक्के, १५४ तालुक्यांत ५१ ते ७५ टक्के, १११ तालुक्यांत ७६ ते १00 टक्के आणि ५६ तालुक्यांत १00 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अल्प पावसामुळे अख्खा महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभा आहे. खरिपाचा हंमाग बुडाला, आता रब्बी हंगामानेही डोळे वटारले. परिणामी, राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिप पिकांच्या हंगामी पैसेवारीने ही बाब अधोरेखित केली आहे. राज्यातील ३९ हजार १३४ गावांपैकी १९ हजार ६९ गावांची गावातील खरिप पिकांची हंमागी पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आलेली आहे. लागवड खर्च व प्रत्यक्ष उत्पन्न यातील तफावत कमालीची वाढली आहे. परिणामी, शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पार विस्कटले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह व लोकांची देणी-घेणी भागविण्यासाठी शेतकर्‍यांना आतापासूनच सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे या शेतकर्‍यांना आता शासकीय मदतीची आस लागली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपदग्रस्त परिस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री पुढाकार घेऊन जिल्हावासीयांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करतात. दुष्काळाशी संबंधित उपाययोजनांमध्येही पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची असते. मात्र, सत्तेची गणितं जुळविण्यात मश्गुल असलेल्या राज्यातील फडणविस सरकारने अद्याप पालकमंत्री नियुक्त केलेले नाहीत. त्यामूळे प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बैठकाही खोळंबल्या आहेत. साधारणत: प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेऊन, जिल्ह्यातील पिक, पाणी व इतर परिस्थिती जाणून घेतात. त्यांनतर कोणत्या उपाययोजना राबविता येतील, शेतकर्‍यांना कशी मदत देता येईल, जनावरांसाठी चारा कसा उपलब्ध करता येईल, आदी बाबींचे नियोजन करतात. एवढेच नव्हे तर शासन दरबारी पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी खेचून आणण्याचा प्रयत्नही पालकमंत्री करतात. दुष्काळी गावांचा दौरा करून प्रशासनाला योग्य दिशानिर्देश देतात; मात्र नव्या सरकारने पालकमंत्रीच नेमलेले नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अश्रु पुसावे तरी कुणी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.