शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शेतकरी जागर मंचतर्फे संपूर्ण कर्जमुक्तीचा जागर

By admin | Updated: April 24, 2017 01:57 IST

कर्जमुक्तीसाठी आंदोलन: जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती १ मे ला घेणार कर्जमुक्तीचा ठराव

अकोला : शेतकरी राजा आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यात शासनाने तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांना संकटात लोटले आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी कायदा असूनही शेतमालाचे भाव पाडले जातात. मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाल्यानंतरही शासनाने लाखो टन तुरीची डाळ आयात केली. शासनाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन संपूर्ण कर्जमुक्तीसाठी लढा द्यावा, यासाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने कर्जमुक्तीचा जागर करून १ मे रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कर्जमुक्तीचा ठराव घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज तायडे, प्रशांत गावंडे यांनी रविवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.शेतकरी जागर मंचच्यावतीने रविवारी जिल्ह्यातील सरपंचांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसह नाफेडने बंद केलेली तूर खरेदीसंदर्भात चर्चा करण्यात आली. गत तीन वर्षांपासून सततचा दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला. यंदा पीक परिस्थिती सुधारली. मात्र, शासनाने व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतमालाचे भाव पाडले. बँकांकडून सक्तीची कर्जवसुली करण्यात येत आहे. शासन केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे. गतवर्षी ८ ते १३ हजार रुपयांपर्यंत तूर, हरभऱ्याचे भाव वाढले होते. शासनाने कडधान्य घेण्याचे आवाहन केल्यानुसार शेतकऱ्यांनी कडधान्याचा पेरा वाढवला. तूर, मूग, हरभऱ्याचे उत्पादन अधिक झाले; परंतु शेतमालाला चार हजारांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. शासनाने सर्वच बाजूने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली आहे. बँकांमध्ये आमच्या हक्काचे पैसेच आम्हाला मिळत नाहीत. लग्न, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. भाजप शासनाने दोन वर्षांपासून दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोलच्या प्रत्येक लीटरमागे सहा रुपयांप्रमाणे अधिभार जनतेकडून वसूल केला; परंतु त्यातील एकही पैसा दुष्काळग्रस्तासाठी खर्च केला नाही. पेट्रोलच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत जमा झालेले चौदा हजार कोटी रुपये कुठे गेले? याचे उत्तर शासनाकडे नाही, असा आरोपही शेतकरी जागर मंचातर्फे करण्यात आला. शासनाला जागे करण्यासाठी शेतकरी जागर मंचातर्फे १ मे रोजी सर्व ग्रामपंचायतींना संपूर्ण कर्जमुक्तीचा ठराव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्जमुक्तीचा ठरावानंतर शेतकरी जागर मंचतर्फे संपूर्ण कर्जमुक्तीसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असेही शेतकरी जागर मंचतर्फे स्पष्ट करण्यात आले. पत्रपरिषदेला जगदीश मुरूमकार, कृष्णा अंधारे, काशीराम साबळे, टिना देशमुख, राजेश मंगळे उपस्थित होते. शेकडो शेतकरी, सरपंचांची उपस्थितीशेतकरी जागर मंचच्या बैठकीला जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, सरपंच, उपसरपंचांनी हजेरी लावली. यात शिवाजी म्हैसने, सुनील गोंडचवर, किशोर कुकडे, दिलीप मोहोड, मुरलीधर पुरंगे, भास्कर वानखडे, मोहन मते, विजय के. देशमुख, विनोद देशमुख, ज्ञानेश्वर मानकर, संतोष झाकर्डे, मंगेश मांगटे, वासुदेव कुचर, माणिक इंगळे, राजू पंडित, प्रशांत फुरंगे, उषा गवई, संतोष इंगळे, गजानन हरणे, बाळ मुरूमकार, गजानन पारधी, राजेश खोडके, सम्राट डोंगरदिवे यांचा समावेश आहे.