शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

शेतकरी जागर मंचतर्फे संपूर्ण कर्जमुक्तीचा जागर

By admin | Updated: April 24, 2017 01:57 IST

कर्जमुक्तीसाठी आंदोलन: जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती १ मे ला घेणार कर्जमुक्तीचा ठराव

अकोला : शेतकरी राजा आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यात शासनाने तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांना संकटात लोटले आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी कायदा असूनही शेतमालाचे भाव पाडले जातात. मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाल्यानंतरही शासनाने लाखो टन तुरीची डाळ आयात केली. शासनाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन संपूर्ण कर्जमुक्तीसाठी लढा द्यावा, यासाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने कर्जमुक्तीचा जागर करून १ मे रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कर्जमुक्तीचा ठराव घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज तायडे, प्रशांत गावंडे यांनी रविवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.शेतकरी जागर मंचच्यावतीने रविवारी जिल्ह्यातील सरपंचांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसह नाफेडने बंद केलेली तूर खरेदीसंदर्भात चर्चा करण्यात आली. गत तीन वर्षांपासून सततचा दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला. यंदा पीक परिस्थिती सुधारली. मात्र, शासनाने व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतमालाचे भाव पाडले. बँकांकडून सक्तीची कर्जवसुली करण्यात येत आहे. शासन केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे. गतवर्षी ८ ते १३ हजार रुपयांपर्यंत तूर, हरभऱ्याचे भाव वाढले होते. शासनाने कडधान्य घेण्याचे आवाहन केल्यानुसार शेतकऱ्यांनी कडधान्याचा पेरा वाढवला. तूर, मूग, हरभऱ्याचे उत्पादन अधिक झाले; परंतु शेतमालाला चार हजारांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. शासनाने सर्वच बाजूने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली आहे. बँकांमध्ये आमच्या हक्काचे पैसेच आम्हाला मिळत नाहीत. लग्न, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. भाजप शासनाने दोन वर्षांपासून दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोलच्या प्रत्येक लीटरमागे सहा रुपयांप्रमाणे अधिभार जनतेकडून वसूल केला; परंतु त्यातील एकही पैसा दुष्काळग्रस्तासाठी खर्च केला नाही. पेट्रोलच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत जमा झालेले चौदा हजार कोटी रुपये कुठे गेले? याचे उत्तर शासनाकडे नाही, असा आरोपही शेतकरी जागर मंचातर्फे करण्यात आला. शासनाला जागे करण्यासाठी शेतकरी जागर मंचातर्फे १ मे रोजी सर्व ग्रामपंचायतींना संपूर्ण कर्जमुक्तीचा ठराव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्जमुक्तीचा ठरावानंतर शेतकरी जागर मंचतर्फे संपूर्ण कर्जमुक्तीसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असेही शेतकरी जागर मंचतर्फे स्पष्ट करण्यात आले. पत्रपरिषदेला जगदीश मुरूमकार, कृष्णा अंधारे, काशीराम साबळे, टिना देशमुख, राजेश मंगळे उपस्थित होते. शेकडो शेतकरी, सरपंचांची उपस्थितीशेतकरी जागर मंचच्या बैठकीला जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, सरपंच, उपसरपंचांनी हजेरी लावली. यात शिवाजी म्हैसने, सुनील गोंडचवर, किशोर कुकडे, दिलीप मोहोड, मुरलीधर पुरंगे, भास्कर वानखडे, मोहन मते, विजय के. देशमुख, विनोद देशमुख, ज्ञानेश्वर मानकर, संतोष झाकर्डे, मंगेश मांगटे, वासुदेव कुचर, माणिक इंगळे, राजू पंडित, प्रशांत फुरंगे, उषा गवई, संतोष इंगळे, गजानन हरणे, बाळ मुरूमकार, गजानन पारधी, राजेश खोडके, सम्राट डोंगरदिवे यांचा समावेश आहे.