शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

शेतकरी आंदोलनाची धग कायमच!

By admin | Updated: June 7, 2017 01:34 IST

अकोला : शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून जिल्हाभरात सुरु झालेल्या आंदोलनाची धग मंगळवारीही कायम होती.शेतकऱ्यांनी विविध आंदोलने करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून जिल्हाभरात सुरु झालेल्या आंदोलनाची धग मंगळवारीही कायम होती. मूर्तिजापूर, अकोट, तेल्हाऱ्यासह अकोल्यात शेतकऱ्यांनी विविध आंदोलने करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. बाजारपेठेत अजूनही शेतमालाची आवक कमी असून त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या भाववाढीवर झाला आहे. अकोटात शेतकरी पुत्रांचे मुंडण आंदोलनअकोट: शेतकरी संपावर असताना विविध आंदोलने पेटली आहेत. अशातच अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून ६ जून रोजी शिवाजी चौकात मुंडण आंदोलन केले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनात युवा पिढीनेसुद्धा उडी घेतली आहे. शेतकरी संप शासनाला गांभीर्याने अद्यापही कळला नसल्याने आंदोलनाचे प्रमुख राम म्हैसने यांच्यासह युवकांनी शिवाजी चौकात मुंडण करून आंदोलन केले. शासनाच्या भूमिकेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी ज्ञानू कुलट, दत्ता वाघ, गजानन डांगे, गोपाल वाघ, बबलू मोहोकार, कैलास म्हैसने, संतोष वसू, गोपाल चिकटे, बाळासाहेब नाठे, अजाबराव वानखडे, शुभम देशमुख, अल्पेश दुधे, वैभव पोटे, गौरव डोबाळे, ऋषिकेश चावरे, विपुल ठाकरे, वैभव डिक्कर, प्रफुल्ल म्हैसने, श्याम वाघ, भूषण झापर्डे, ज्ञानेश्वर रेठे, रितेश उजिळे, अक्षय मोरे, विजू लिल्लारे, अक्षय रावणकार, गणू भावे, योगेश डोबाळे, संदीप डोबाळे, धीरज नाथे, आदेश खोकले, रजत राठी, वैभव मोरे, मुन्ना म्हैसने, अर्जुन लासूरकर, विलास भोजने, महेश काळे यांची उपस्थिती होती. मूर्तिजापूर : बाजार बंद मूर्तिजापूर: शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून मूर्तिजापूर येथे मंगळवार ६ जून रोजी बाजार बंद करण्यात आला. या आंदोलनात दूध व कांदे रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला.या आंदोलनास शेतकरी, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांनी स्वत:चे व्यवसाय बंद करून आंदोलनात भाग घेतला. या प्रसंगी अनेकांची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन शेतकरी कामगार पक्षाचे विजय गावंडे यांनी केले. प्रगती शेतकरी संघटनेचे राजूभाऊ वानखडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शिवसेनेचे विनायक गुल्हाने, शरद भटकर, अप्पू तिडके आणि शेतकरी संघटनेचे विजय लोडम, बाळासाहेब तायडे, गुरुदेव सेवा मंडळाचे माधव काळे, कापूस उत्पादक संघाचे रमेशभाऊ देशमुख, प्रगती शेतकरी संघटनेचे देवीदास बांगड, ग्राहक मंचाचे प्रकाशसिंग राजपूत, जीवन ढोकणे, सेवकराम लहाने व प्रा. सुधाकर गौरखेडे (जनमंच) यांनी मार्गदर्शन केले. अरुणभाऊ बोर्डे, सेवकराम लहाने, शरद बंग, नीलेश मालधुरे, स्वप्निल देशुमख, कैलास साबळे, नितीन गावंडे, सागर ढोरे, मुन्ना नाईकनवरे, गोपाल तायडे, प्रदीप तायडे, मंगेश बेलसरे, प्रफुल्ल मालधुरे, देवानंद डहाके इत्यादींनी परिश्रम घेतले. अशरफभाई, खलीलभाई, फारुखभाई, माणिकराव खरबडकार, शेरखा तजमुलखा, तस्लीम खा, विनोद उमाळे, सुधाकर टाक, गोविंद नगरे, मुन्ना दुबे, संदीप बोळे या व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करून आंदोलनात भाग घेतला.हिवरखेड येथे मोर्चाहिवरखेड : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे ६ जून रोजी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व इतर मागण्यांसाठी मोर्चा काढला.हिवखेड येथे मंगळवारी सकाळी १० वाजता शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शिवसैनिक, शंभुभक्त सेना व छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर मोर्चा मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत ‘शेकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’, स्वामिनाथन आयोग त्वरित लागू करा, अशा व इतर घोषणांच्या निनादात सोनवाडी स्टॉपपर्यंत आला. सोनवाडी स्टॉपवर शेतकरी व शिवसैनिकांनी सरकारचा निषेध नोंदवत फळे व भाजीपाला रस्त्यावर टाकून दिला. यावेळी शेतकरी व शिवसेनेचे पुरुषोत्तम गावंडे, अर्जुन गावंडे, अभिषेक धांडे, राजेश भोपळे, विशाल कोकाटे, अजय नवले, सागर मानकर, अंकुश निळे, गणेश ठाकरे, राहुल वाणे, आकाश इंगळे, मंगेश मोरोकार, पंकज देशमुख, दिनेश पिसोळे, सुनील नवले यांच्यासह शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. हिवरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.टाळे ठोकण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनशेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून अकोल्यात मंगळवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते; मात्र तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  त्यामुळे शेतकऱ्यांनी घोषणा देत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी प्रशांत गावंडे, प्रकाश मानकर, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.