शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

शेतजमीन भेगाळली!

By admin | Updated: July 7, 2015 01:45 IST

भर पावसाळ्य़ात शेतातील ओलावा नष्ट; तापमानात वाढ.

अकोला : राज्यात पाऊस नसल्याने शेतातील ओलावा नष्ट झाला असून, जमीन आकुंचन पावल्याने जमिनीला प्रचंड भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर पुन्हा हे नवे संकट उभे ठाकले आहे. जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर राज्यातील शेतकर्‍यांनी ४५ ते ५0 टक्के क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी केली असून, ही पिके अंकुरली आहेत. परंतु अचानक पावसाने दडी मारली आणि उष्णतामानातही प्रचंड वाढ झाल्याने शेतातील ओलावा कमी झाला. परिणामी शेतात प्रचंड भेगा पडल्या असून, जमीन कडक झाली आहे. शेतजमीन फाकल्यामुळे पिकांच्या मुळापर्यंत गरम हवा अर्थात तापमान शिरत असल्याने खरीप हंगामातील अंकुरलेली पिके वाळली आहेत. खरे तर उन्हाळ्य़ात जमीन फाकण्याचे प्रकार घडतात, पण सध्या पावसाळय़ात जमीन फाकण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी या नवीन संकटाने हवालदिल झाला आहे.यंदा जून महिन्यातील दहा दिवस पूर्व विदर्भात बर्‍यापैकी पाऊस कोसळला; पण पश्‍चिम विदर्भ, मराठवाडा या विभागात पावसाचा जोर नव्हता. या विभागांना सुरुवातीपासूनच पावसाचा फटका बसला आहेच; याच बरोबर संपूर्ण राज्यातील पेरण्या रखडल्या आहेत. आता पाऊस आला तरी उशिरा पेरणी करावी लागणार असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.