शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

शेतजमीन भेगाळली!

By admin | Updated: July 7, 2015 01:45 IST

भर पावसाळ्य़ात शेतातील ओलावा नष्ट; तापमानात वाढ.

अकोला : राज्यात पाऊस नसल्याने शेतातील ओलावा नष्ट झाला असून, जमीन आकुंचन पावल्याने जमिनीला प्रचंड भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर पुन्हा हे नवे संकट उभे ठाकले आहे. जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर राज्यातील शेतकर्‍यांनी ४५ ते ५0 टक्के क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी केली असून, ही पिके अंकुरली आहेत. परंतु अचानक पावसाने दडी मारली आणि उष्णतामानातही प्रचंड वाढ झाल्याने शेतातील ओलावा कमी झाला. परिणामी शेतात प्रचंड भेगा पडल्या असून, जमीन कडक झाली आहे. शेतजमीन फाकल्यामुळे पिकांच्या मुळापर्यंत गरम हवा अर्थात तापमान शिरत असल्याने खरीप हंगामातील अंकुरलेली पिके वाळली आहेत. खरे तर उन्हाळ्य़ात जमीन फाकण्याचे प्रकार घडतात, पण सध्या पावसाळय़ात जमीन फाकण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी या नवीन संकटाने हवालदिल झाला आहे.यंदा जून महिन्यातील दहा दिवस पूर्व विदर्भात बर्‍यापैकी पाऊस कोसळला; पण पश्‍चिम विदर्भ, मराठवाडा या विभागात पावसाचा जोर नव्हता. या विभागांना सुरुवातीपासूनच पावसाचा फटका बसला आहेच; याच बरोबर संपूर्ण राज्यातील पेरण्या रखडल्या आहेत. आता पाऊस आला तरी उशिरा पेरणी करावी लागणार असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.