शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमीन भेगाळली!

By admin | Updated: July 7, 2015 01:45 IST

भर पावसाळ्य़ात शेतातील ओलावा नष्ट; तापमानात वाढ.

अकोला : राज्यात पाऊस नसल्याने शेतातील ओलावा नष्ट झाला असून, जमीन आकुंचन पावल्याने जमिनीला प्रचंड भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर पुन्हा हे नवे संकट उभे ठाकले आहे. जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर राज्यातील शेतकर्‍यांनी ४५ ते ५0 टक्के क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी केली असून, ही पिके अंकुरली आहेत. परंतु अचानक पावसाने दडी मारली आणि उष्णतामानातही प्रचंड वाढ झाल्याने शेतातील ओलावा कमी झाला. परिणामी शेतात प्रचंड भेगा पडल्या असून, जमीन कडक झाली आहे. शेतजमीन फाकल्यामुळे पिकांच्या मुळापर्यंत गरम हवा अर्थात तापमान शिरत असल्याने खरीप हंगामातील अंकुरलेली पिके वाळली आहेत. खरे तर उन्हाळ्य़ात जमीन फाकण्याचे प्रकार घडतात, पण सध्या पावसाळय़ात जमीन फाकण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी या नवीन संकटाने हवालदिल झाला आहे.यंदा जून महिन्यातील दहा दिवस पूर्व विदर्भात बर्‍यापैकी पाऊस कोसळला; पण पश्‍चिम विदर्भ, मराठवाडा या विभागात पावसाचा जोर नव्हता. या विभागांना सुरुवातीपासूनच पावसाचा फटका बसला आहेच; याच बरोबर संपूर्ण राज्यातील पेरण्या रखडल्या आहेत. आता पाऊस आला तरी उशिरा पेरणी करावी लागणार असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.