शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेत मशागत मंद गतीने!

By admin | Updated: April 13, 2016 01:29 IST

अकोला जिल्ह्यात मागील वर्षी ३0 टक्के क्षेत्र नापेर; हातात पैसा नाही.

अकोला : शेतकर्‍यांच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे यावर्षी एप्रिल महिना उजाडला, तरी शेत मशागतीच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. यातच जमीन कडक असल्याने नांगरटी करणे शक्य नाही आणि शासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.अकोला जिल्हय़ात खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र ४ लाख ८२ हजार हेक्टर असून, मागीलवर्षी अल्प पावसामुळे २0 ते ३0 टक्के क्षेत्र नापेर राहिले आहे. ज्या शेतकर्‍यांनी धाडस करून पेरणी केली त्यांचे उत्पादन प्रचंड घटले असून, सोयाबीनचा एकरी उतारा ५0 किलो ते दीड क्विंटलपर्यंत आला आहे. कापसच्या उत्पादनातही घट झाली, तुरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. मागील दहा वर्षांपासून शेतकरी या संकटाचा सामना करीत असून, पावसाची अनिश्‍चितता बघता शेतकर्‍यांचे उत्पादन,उत्पन्न वाढले नाही, हमी दरात सुधारले नाही. परिणामी, उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकर्‍यांकडे पैसाच शिल्लक नाही. मागीलवर्षी पुन्हा निसर्गाने अवकृपा दाखवल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली असून, आजमितीस शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती खिळखिळी झाली आहे. शेतकर्‍यांना उदरनिर्वाह करणे, कुटुंबाचे गुजराण, मुला-मुलींचे लग्न, शाळेचा खर्च यातच शेतकरी पुरता खचला असून, हातात शेत मशागतीसाठी पैसाच नसल्याने विदर्भातील ९0 टक्के भूधारक, अल्पभूधारक शेतकर्‍यांची अवस्था वाईट आहे. तुकड्याची शेती करताना, शेतकर्‍यांना कठीण होत असून, उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक वाढल्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांच्या आर्थिक, सामाजिक जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. कर्जाचा डोंगर वाढल्याने या दुष्काळात, शेतकर्‍यांनी शेती विकायला काढली असून, शेकडो शेतकर्‍यांनी शेती ठोक्याने काढली आहे.