शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

दुष्काळात जनावरांना कवडीमोल भाव

By admin | Updated: April 11, 2016 01:34 IST

पाणी नाही, चारा नाही : जनावरे जगविण्याची शेतक-यांना चिंता.

संतोष येलकर/अकोलादुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चारा नसल्याने जनावरे जगविणार कशी, याबाबतची चिंता जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सतावत आहे. टंचाईच्या परिस्थितीत जनावरे विकण्याशिवाय पर्याय नाही; मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावाने ती विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली.जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. अत्यल्प पावसामुळे नदी-नाले आटले असून, धरणांमध्येही अत्यल्प जलसाठा आहे तसेच नापिकीमुळे चारा उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत पाणी व चार्‍याच्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, जनावरांना जगविण्यासाठी पाणी आणि चारा कोठून आणणार, असा प्रश्न गावागावांतील शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यात लहान व मोठी ३१७१0५ जनावरे आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदींचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चारा उपलब्ध नाही. चार्‍याचे भाव गगनाला भिडल्याने, जनावरांना जगविणार कसे, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. या पृष्ठभूमीवर जनावरे विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला, सांगळूद, चोहोट्टाबाजार, मूर्तिजापूर, वाडेगाव, सिंदखेड, बाश्रीटाकळी, चान्नी, हातगाव आदी ठिकाणच्या बाजारात विक्रीसाठी येणार्‍या जनावरांची संख्या वाढली आहे. बाजारात आणलेल्या पशुधनाला दुष्काळी परिस्थितीमुळे मागणी नसल्याने, मिळेल त्या भावात पशुधन विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.