शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याच्या भावात घसरण; सुक्यामेव्याचे भाव वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांना फटका बसल्याने अनेक पिके वाया गेली. तसेच पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. ...

यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांना फटका बसल्याने अनेक पिके वाया गेली. तसेच पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. दर महिन्याच्या किराणा साहित्याच्या यादीतील तूर, उडीद, हरभरा डाळीचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. दुसरीकडे शहरात थंडीचा जोर वाढल्याने सुक्यामेव्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्राहक थंडीच्या दिवसात खारीक, खोबरा, काजू, बदाम यांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.

असे आहेत भाजीपाल्याचे भाव

कांदे ४० ते ४५ रुपये, लसूण १०० ते १२० रुपये, फुलकोबी २० रुपये प्रतिकिलो, वांगी १० ते २० रुपये, मेथी १० ते २० रुपये, पालक २० ते ३० रुपये, दाेडके २० ते ३० रुपये, कोथिंबीर २० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, कारली ४० ते ५० रुपये, बटाटे २० ते ३० रुपये प्रतिकिलोदराने मिळत आहे.

फळांची मागणी वाढली

भाजीपाल्याच्या भावात घसरण झाली; फळांचे भाव स्थिर असल्याचे चित्र आहे. बाजारात फळांची मागणी वाढली आहे.

खाद्यतेलाचे भाव गगनाला, महिलांची पंचाईत

भाजीपाल्यांचे भाव कमी झाले असले, तरी सध्या सुकामेव्याचे भाव वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. सध्या बाजार खारीक २२० ते ३००, खोबरा २०० ते २५० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तसेच खाद्य तेलाचे भावही वाढल्याने महिलांची चांगलीच पंचाईत होत आहे.

स्वयंपाक घरात महत्त्वाचे असलेले खाद्यतेलाचे भाव वाढल्याने बजेटच कोलमडले आहे, सुकामेव्याच्या भावात वाढ झाल्याने पंचाईत झाली आहे.

- गृहिणी, अकोला.

बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली, तरी उत्पादनात घट झाल्याने आवक घटली आहे. दर वाढल्याने ग्राहक कमी झाले आहेत. भाजीपाला पूर्ण खपतही नाही.

-भाजीपाला विक्रेता, अकोला.