शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

ठोक्याच्या शेतीला लागेना बोली!

By admin | Updated: April 30, 2016 01:43 IST

दुष्काळात शेतकरी संकटात; ठोक्यासाठी देणारा तयार; घेण्यास कोणी येईना समोर.

संतोष येलकर / अकोलासतत तीन वर्षांपासूनची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. संसाराचा गाडा कसा हाकायचा आणि येत्या खरीप हंगामात पेरणीचा खर्च भागविण्याची चिंता सतावत असलेला शेतकरी शेती ठोक्याने देण्यास तयार असला तरी घेण्यास कोणी तयार नसल्याने ठोक्याच्या शेतीचे भाव कमालीने घसरले आहेत. त्यामुळे यंदा 'ठोक्याच्या शेतीला लागेना बोली' अशी परिस्थिती जिल्हय़ातील गावागावात निर्माण झाली आहे.हिवाळा संपताच ठोक्याच्या शेतीचे व्यवहार गावागावात सुरू होतात; परंतु गत तीन वर्षांच्या कालावधीत आधी अतवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट आणि गतवर्षी व यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला. पिकाचे उत्पादन झाले बुडाल्याने पैसा नाही, त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न एकूणच संसाराचा गाडा कसा चालवायचा, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जवळ पैसा नसताना येत्या खरीप हंगामात शेतीची मशागत, पेरणीसाठी बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.पेरणीचा खर्च करूनही शेतीचे उत्पादन मिळणार की नाही, याबाबत खात्री नसल्याने, जिल्हय़ातील गावागावात शेती ठोक्याने देण्यास शेतकरी तयार असला तरी, घेण्यास कोणी तयार नसल्याची स्थिती आहे. दरवर्षी कोरडवाहू शेती १0 ते १२ हजार रुपये एकर आणि ओलिताची शेती १५ ते १८ हजार रुपये एकर दराप्रमाणे ठोक्याने केली जाते; परंतु दुष्काळी परिस्थितीत यावर्षी ठोक्याच्या शेतीचे भाव कमालीने घसरले आहेत. जिल्हय़ात सध्या ठोक्याच्या शेती व्यवहारामध्ये कोरडवाहू शेती प्रती एकर ३ हजार रुपये आणि ओलिताच्या शेतीला प्रती एकर ७ ते ८ हजार रुपये असा भाव मिळत आहे. भाव प्रचंड कमी असूनही, ठोक्याने शेती घेण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ात ठोक्याच्या शेतीला बोली लागत नसल्याची स्थिती आहे.