शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

ठोक्याच्या शेतीला लागेना बोली!

By admin | Updated: April 30, 2016 01:43 IST

दुष्काळात शेतकरी संकटात; ठोक्यासाठी देणारा तयार; घेण्यास कोणी येईना समोर.

संतोष येलकर / अकोलासतत तीन वर्षांपासूनची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. संसाराचा गाडा कसा हाकायचा आणि येत्या खरीप हंगामात पेरणीचा खर्च भागविण्याची चिंता सतावत असलेला शेतकरी शेती ठोक्याने देण्यास तयार असला तरी घेण्यास कोणी तयार नसल्याने ठोक्याच्या शेतीचे भाव कमालीने घसरले आहेत. त्यामुळे यंदा 'ठोक्याच्या शेतीला लागेना बोली' अशी परिस्थिती जिल्हय़ातील गावागावात निर्माण झाली आहे.हिवाळा संपताच ठोक्याच्या शेतीचे व्यवहार गावागावात सुरू होतात; परंतु गत तीन वर्षांच्या कालावधीत आधी अतवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट आणि गतवर्षी व यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला. पिकाचे उत्पादन झाले बुडाल्याने पैसा नाही, त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न एकूणच संसाराचा गाडा कसा चालवायचा, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जवळ पैसा नसताना येत्या खरीप हंगामात शेतीची मशागत, पेरणीसाठी बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.पेरणीचा खर्च करूनही शेतीचे उत्पादन मिळणार की नाही, याबाबत खात्री नसल्याने, जिल्हय़ातील गावागावात शेती ठोक्याने देण्यास शेतकरी तयार असला तरी, घेण्यास कोणी तयार नसल्याची स्थिती आहे. दरवर्षी कोरडवाहू शेती १0 ते १२ हजार रुपये एकर आणि ओलिताची शेती १५ ते १८ हजार रुपये एकर दराप्रमाणे ठोक्याने केली जाते; परंतु दुष्काळी परिस्थितीत यावर्षी ठोक्याच्या शेतीचे भाव कमालीने घसरले आहेत. जिल्हय़ात सध्या ठोक्याच्या शेती व्यवहारामध्ये कोरडवाहू शेती प्रती एकर ३ हजार रुपये आणि ओलिताच्या शेतीला प्रती एकर ७ ते ८ हजार रुपये असा भाव मिळत आहे. भाव प्रचंड कमी असूनही, ठोक्याने शेती घेण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ात ठोक्याच्या शेतीला बोली लागत नसल्याची स्थिती आहे.