शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ठोक्याच्या शेतीला लागेना बोली!

By admin | Updated: April 30, 2016 01:43 IST

दुष्काळात शेतकरी संकटात; ठोक्यासाठी देणारा तयार; घेण्यास कोणी येईना समोर.

संतोष येलकर / अकोलासतत तीन वर्षांपासूनची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. संसाराचा गाडा कसा हाकायचा आणि येत्या खरीप हंगामात पेरणीचा खर्च भागविण्याची चिंता सतावत असलेला शेतकरी शेती ठोक्याने देण्यास तयार असला तरी घेण्यास कोणी तयार नसल्याने ठोक्याच्या शेतीचे भाव कमालीने घसरले आहेत. त्यामुळे यंदा 'ठोक्याच्या शेतीला लागेना बोली' अशी परिस्थिती जिल्हय़ातील गावागावात निर्माण झाली आहे.हिवाळा संपताच ठोक्याच्या शेतीचे व्यवहार गावागावात सुरू होतात; परंतु गत तीन वर्षांच्या कालावधीत आधी अतवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट आणि गतवर्षी व यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला. पिकाचे उत्पादन झाले बुडाल्याने पैसा नाही, त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न एकूणच संसाराचा गाडा कसा चालवायचा, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जवळ पैसा नसताना येत्या खरीप हंगामात शेतीची मशागत, पेरणीसाठी बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.पेरणीचा खर्च करूनही शेतीचे उत्पादन मिळणार की नाही, याबाबत खात्री नसल्याने, जिल्हय़ातील गावागावात शेती ठोक्याने देण्यास शेतकरी तयार असला तरी, घेण्यास कोणी तयार नसल्याची स्थिती आहे. दरवर्षी कोरडवाहू शेती १0 ते १२ हजार रुपये एकर आणि ओलिताची शेती १५ ते १८ हजार रुपये एकर दराप्रमाणे ठोक्याने केली जाते; परंतु दुष्काळी परिस्थितीत यावर्षी ठोक्याच्या शेतीचे भाव कमालीने घसरले आहेत. जिल्हय़ात सध्या ठोक्याच्या शेती व्यवहारामध्ये कोरडवाहू शेती प्रती एकर ३ हजार रुपये आणि ओलिताच्या शेतीला प्रती एकर ७ ते ८ हजार रुपये असा भाव मिळत आहे. भाव प्रचंड कमी असूनही, ठोक्याने शेती घेण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ात ठोक्याच्या शेतीला बोली लागत नसल्याची स्थिती आहे.