शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रेकॉर्ड न ठेवणे भोवले! कृषी केंद्रांचे नऊ परवाने कायमस्वरूपी रद्द; कृषी विभागाची कारवाई

By रवी दामोदर | Updated: August 3, 2023 11:59 IST

तीन कृषी केंद्रांना दिली ताकीद.

रवी दामोदर, अकोला

अकोला : यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबवली. त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांकडून परवाना घेतल्यापासून व्यवहार न करणे, तसेच काही कृषी सेवा केंद्रांचे रेकॉर्डच नसल्याचे समोर आले आहे. अशा कृषी सेवा केंद्रांचे ९ परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तर तीन कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून सोयाबीन बियाणे व खत विक्रीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काही विक्रेत्यांनी वेठीस धरल्याची प्रकरणे समोर आली. शेतकऱ्यांकडून बियाणे उगवले नसल्याच्या सातत्याने तक्रारींचा ओघ वाढला होता. यंदा काही ठिकाणी कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांची पाहणी केली असता त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांकडून रेकॉर्ड ठेवले नसल्याचे आढळून आले आहे. तसेच परवाना घेतल्याच्या काळापासून एकही व्यवहार केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून त्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करीत ९ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये बियाण्यांचे तीन, खतांचे दोन व कीटकनाशकांच्या चार परवान्यांचा समावेश आहे.

बाळापूर तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद

कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत बाळापूर तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांच्या रेकॉर्डमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून त्या तीन कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.