शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बंदीच्या बेड्यांनंतरही गुटख्याच्या व्यसनाला ‘वेसन’ घालण्यात अपयश!

By admin | Updated: December 19, 2014 01:47 IST

लोकमत सर्वेक्षण;गुटखा बंदीचा परिणाम शून्य; बंदीनंतर दर वाढूनही विक्री आलेख कायम.

अकोला- राज्यात दीड वर्षांपूर्वी गुटखा विक्रीला बंदी करण्यात आली. विक्रीवर बंदी लादली असली तरी उत्पादनावर कोणतेही बंधने नसल्याने अकोला शहराच्या कानाकोपर्‍यात गुटखा पुडी सहज उपलब्ध होते. बंदीपूर्वी एक पुडी घेऊन गुटखा खाणार्‍या युवकांना आता एका वेळी तीन-तीन पुड्या विकत घ्याव्या लागतात. साहजिकच खिश्यात गुटखा पुड्या असल्याने वाटेल तेव्हा ती फाडून तोंडा टाकण्याची सवयही वाढली आहे. एकूणच बंदीपूर्वी गुटखा खाणार्‍यांची संख्या अधिक असली तरी बंदीनंतर ती कमी होईल, हा शासनाचा उद्देश पूर्ण झालेला नसल्याचे ह्यलोकमतह्णने तरूण आणि प्रौढ वर्गातील निवडक व्यक्तींचा सर्व्हे केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. गुटा विक्री करणार्‍यांसोबतच तरूण आणि प्रौढ व्यक्तींसोबत गुटखा खाण्याच्या सवयीवर केलेल्या चर्चेतून आणि काही निवड प्रश्नांची उत्तरे नोंदवून काढलेल्या निष्कर्षानुसार गुटखा बंदीपूर्वी जेव्हा खाण्याची तलब आली तेव्हाच पुडी विकत घेऊन खाण्याची सवय असणारे ५0 टक्क्यांपेक्षा अधिक तरूण आणि प्रौढ होते. आता मात्र हेच तरूण दिवसभर पुरेल एवढय़ा गुटखा पुड्या एकाच वेळी विकत घेतात. खिश्यात पुड्या राहत असल्यामुळे कुठेही असो, पुडी विकत घेण्यासाठी जावे लागत नाही. त्यामुळे वाट्टेल तेव्हा ती खाण्याची सवय जडली असल्याचे अनेकांनी सांगितले. दिवसभरासाठी एकाच वेळी पुड्या घेणार्‍यांची संख्या ५५ टक्के आहे. गुटखा खाण्याची आठवण आल्यानंतर पाणटपरीवर जाऊन गुटखा विकत घेणार्‍यांची संख्या २७ टक्के असून मित्रांसोबत किंवा इतर कोणत्याही कारणाने घर किंवा कार्यालयातून बाहेर पडणाल्यानंतर पान टपरीवर जाऊन गुटखा पुडी विकत घेऊन खाणार्‍यांची संख्या १८ टक्के आहे. गुटखा पुडी विकत घेण्यासाठी कितीही रकम देण्याची तयारी व्यसनाधिन झालेल्यांची असते. याबाबत विचारणा केली असता बंदीनंतर माहगड्या गुटखा पुडी घेण्याची तयारी असल्याचे ६७ टक्के लोकांनी सांगितले. बंदीनंतर गुटखा सहज मिळत नसल्याने पुडीतील गुटख्या ऐवजी तंबाखुमध्ये चोळलेल्या सुपारीचा गुटखा खाणे सुरू केले असल्याचे २२ टक्के लोकांनी सांगितले. ११ टक्के लोकांनी गुटखा खाणे बंद केले असून त्यांनी तंबाखूवर तलब भागविणे सुरू केल आहे. बंदीनंतर गुटखा खाणे बंद करणे किंवा तंबाखुजन्य पदार्थांपासून परावृत्त झालेल्यांची संख्या नगण्य आहे.