शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’

By admin | Updated: May 4, 2015 01:21 IST

अकोला येथे शंकरबाबा पापळकर यांच्या सोळाव्या मानसकन्येचा विवाह सोहळा.

विवेक चांदूरकर/ अकोला: केंद्र व राज्यातील मंत्री, आजी-माजी आमदार, सर्वपक्षीय नेते, बहुतांश खात्याचे अधिकारी, विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसुधारक व हजारो वर्‍हाडींच्या उपस्थितीत शंकरबाबा पापळकर यांच्या सोळाव्या मानसकन्येचा विवाह सोहळा मोठय़ा थाटात रविवारी सायंकाळी मराठा मंडळ कार्यालयात पार पडला. हा सोहळा नयनरम्य होता, उपदेशात्मक होता, ऊर्जात्मक होता. जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला. स्व. अंबादास पंत वैद्य अपंग बालगृह वझ्झर ता. अचलपूर या संस्थेचे सचिव शंकरबाबा पापळकर यांची सोळावी मानसकन्या कांती हिचा विवाह सोहळा बाळापूर येथील मोतीलाल डोळसकर यांचा मुलगा धनंजय यांच्याशी रविवारी सायंकाळी पार पडला. ३ मे रोजी अकोल्यात ४३ डिग्री तापमान होते. मात्र, या तापमानातही लोकांना ओढ होती ती मराठा मंडळ कार्यालयात पार पडणार्‍या विवाह सोहळ्याची. सायंकाळ होताच लोकांची गर्दी जमत होती. मराठा मंडळ मंगल कार्यालय लोकांनी फुलत होते. शंकरबाबा पापळकर स्वत: बॅन्डच्या आवाजात येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत करीत होते. त्यांना मंगल कार्यालयाच्या आतमध्ये सोडत होते. या सोहळ्याला केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, विभागीय उपायुक्त रवींद्र ठाकरे, आ. रणधीर सावरकर, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शंकरबाबा पापळकर यांच्यापासून आम्हाला समाजकार्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन हंसराज अहीर यांनी यावेळी केले.