शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

शेतक-यांचे डोळे आकाशाकडे

By admin | Updated: June 8, 2015 01:42 IST

मशागत आटोपली, पेरणीसाठी जमीन तयार.

अकोला: पाऊस बरसताच यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली असून, शेती पेरणीसाठी तयार आहे. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत असून, डोळे आकाशाकडे लागले आहेत. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दोन्ही हंगामात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात चांगले उत्पन्न होईल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. मॉन्सून ८ ते १२ जूनदरम्यान अकोल्यात दाखल होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीसाठी शेती तयार केली आहे. डवरणी, नांगरणी करून पेरणीपूर्व मशागत आटोपण्यात आली आहे. जिल्हय़ात सरासरी ४ लाख ८२ हजार ६२0 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, त्या तुलनेत यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ५५ हजार १00 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. खरीप पेरणीसाठी जिल्ह्यात ९७ हजार ७५१ क्विंटल बियाण्याची गरज प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच खरीप हंगामात जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७२ हजार ४00 मेट्रिक टन विविध खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गत पंधरा दिवसांपासून भरउन्हात शेतकरी शेतात राबत होते. ४३ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानात शेतकरी शेतात काम करीत आहेत.