शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा वारेमाप उपसा पर्यावरण संतुलनासाठी घातक - हरिदास ताठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 13:34 IST

Excavation of water : पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला.

अकोला : भूगर्भात असलेले ३० टक्के पाणी हे हजाराे वर्षांपासून जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा आहे. पाणी जमिनीत मुरण्याचा कालावधी हा १०० ते एक हजार वर्षापर्यंत एवढा माेठा आहे. आपण मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या पाण्याचा वारेमाप उपसा करत आहाेत. हे पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते मंचावर जिल्हाधिकारी निमा अराेरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. चव्हाण, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे, जलसंपदा विभागाच्या श्रीमती महाजन, प्रीती शेंडे आदी उपस्थित होते. ताठे म्हणाले की, जगाचा ७० टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे त्यापैकी ९७ टक्के पाणी हे समुद्राचे आहे. केवळ ३ टक्केच पाणी जमिनीवर आहे. या ३ टक्क्यांच्या ६९ टक्के पाणी हे बर्फाच्या स्वरूपात असून ३० टक्के पाणी हे भूगर्भात आहे. केवळ १ टक्केच पाणी तलाव, विहिरी व मानवनिर्मित धरणांमध्ये आहे. अशा स्थितीत तब्बल एक ते दाेन हजार फुट खाेल जाऊन पाण्याचा उपसा करण्याचा प्रकार हा अतिशय घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला.पाण्याचे साठे मर्यादित असून त्यांचा वापर योग्य व काटकसरीणे करणे आवश्यक आहे. जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावे याकरिता जलजागृती सप्ताह राबविला जातो. त्याअनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात चित्ररथाव्दारे जनजागृती, पाणी बचतीबाबत चर्चा सत्र, विद्यालयात विद्यार्थ्यांना जलजागृतीबाबत संबोधन, वॉटर रन, रांगोळी व निबंध स्पर्धेव्दारे जलजागृती करण्यात आली, अशी माहिती अ.खु. वसुलकर यांनी प्रास्ताविकातून दिली. जलजागृती सप्ताहात निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सामूहिक जलप्रतिज्ञा झाली. तर हास्यकवी प्रशांत भोंडे यांनी कवितेच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपिका गावंडे यांनी केले.