शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाण्याचा वारेमाप उपसा पर्यावरण संतुलनासाठी घातक - हरिदास ताठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 13:34 IST

Excavation of water : पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला.

अकोला : भूगर्भात असलेले ३० टक्के पाणी हे हजाराे वर्षांपासून जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा आहे. पाणी जमिनीत मुरण्याचा कालावधी हा १०० ते एक हजार वर्षापर्यंत एवढा माेठा आहे. आपण मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या पाण्याचा वारेमाप उपसा करत आहाेत. हे पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते मंचावर जिल्हाधिकारी निमा अराेरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. चव्हाण, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे, जलसंपदा विभागाच्या श्रीमती महाजन, प्रीती शेंडे आदी उपस्थित होते. ताठे म्हणाले की, जगाचा ७० टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे त्यापैकी ९७ टक्के पाणी हे समुद्राचे आहे. केवळ ३ टक्केच पाणी जमिनीवर आहे. या ३ टक्क्यांच्या ६९ टक्के पाणी हे बर्फाच्या स्वरूपात असून ३० टक्के पाणी हे भूगर्भात आहे. केवळ १ टक्केच पाणी तलाव, विहिरी व मानवनिर्मित धरणांमध्ये आहे. अशा स्थितीत तब्बल एक ते दाेन हजार फुट खाेल जाऊन पाण्याचा उपसा करण्याचा प्रकार हा अतिशय घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला.पाण्याचे साठे मर्यादित असून त्यांचा वापर योग्य व काटकसरीणे करणे आवश्यक आहे. जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावे याकरिता जलजागृती सप्ताह राबविला जातो. त्याअनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात चित्ररथाव्दारे जनजागृती, पाणी बचतीबाबत चर्चा सत्र, विद्यालयात विद्यार्थ्यांना जलजागृतीबाबत संबोधन, वॉटर रन, रांगोळी व निबंध स्पर्धेव्दारे जलजागृती करण्यात आली, अशी माहिती अ.खु. वसुलकर यांनी प्रास्ताविकातून दिली. जलजागृती सप्ताहात निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सामूहिक जलप्रतिज्ञा झाली. तर हास्यकवी प्रशांत भोंडे यांनी कवितेच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपिका गावंडे यांनी केले.