शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेला १0 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

कृषिमंत्री फुंडकर यांचे प्रयत्न; केंद्र सरकारने दिली मान्यता.

अकोला : प्रधानमंत्री विमा योजना राबविण्यासाठी राज्य शासनाला अकोल्यासह राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये विमा कंपनी मिळाली नव्हती. २0 जुलै रोजी या कंपन्या निश्‍चित करण्यात आल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना विमा काढण्यासाठी देण्यात आलेली ३१ जुलै ही मुदत अतिशय अपुरी ठरत असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत होती. तिची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री ना. पांडुरंग फुंडकर यांनी मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्र शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव केंद्राने मान्य केला असून, आता १0 ऑगस्टपर्र्यंत पीक विमा काढण्यासाठी मुदत वाढ मिळाली आहे. अकोल्यासह राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये विमा काढण्याची कंपनीची निश्‍चिती २0 जुलै रोजी करण्यात आली. त्यामुळे त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत शेतकर्‍यांना पीक विमा काढण्यासाठी मिळणारी मुदत ही अपुरी होती. त्यामुळे ही मुदत २ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. विमा काढण्यासाठी शेतकर्‍यांना पेरेपत्रक देण्याची अट असल्यामुळे ही सुद्धा मोठी अडचण शेतकर्‍यांसमोर उभी ठाकली. त्यामुळे महसूल विभागाने पुढाकार घेत स्वयं घोषणापत्र देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता पीक विम्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ अतिशय मोलाची ठरणार आहे. विशेष म्हणजे ना. फुंडकर यांनी या संदर्भात ह्यलोकमतह्णने १४ जुलै रोजी प्रकाशित वृत्ताची दखल घेत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती दिली होती

"पीक विम्याला मुदतवाढ देण्याबाबत मी सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका ठेवली. शेतकर्‍यांसमोर कागदपत्रे गोळा करण्यासाठी येणार्‍या अडचणी, विमा कंपनीची निश्‍चिती या सर्व बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांना माहिती दिली व त्यांच्या माध्यमातून केंद्र शासनासोबत चर्चा केली. मी स्वत: केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी चर्चा झाली असून, शेतकर्‍यांचे हित लक्षात घेता मुदतवाढ देण्यात आली आहे."- ना. पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री