शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

उणे तापमानातही अनुभवला कारगिल युद्धाचा थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:20 IST

अकोला : पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिलच्या युद्धात १८ हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी सहभाग ...

अकोला : पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिलच्या युद्धात १८ हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी सहभाग नोंदवीत युद्ध जिंकले. या युद्धात हवाई दल योद्धा म्हणून प्रत्यक्ष लढलेल्या सुनील उपाध्ये यांनी ‘कारगिल’च्या आठवणींना उजाळा दिला. ३० ते ४० अंश उणे तापमानातही सैन्याच्या पोस्टवर त्यांनी युद्धाचा थरार अनुभवला. अत्यंत कठीण परिस्थितीत लढत जवानांनी दाखवलेले शौर्य आजही अंगावर रोमांच उभे करते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले हे सर्वसाधारण युद्ध नव्हते. पाकिस्तानकडून घुसखोरी झाल्याची माहिती मिळताच सर्वप्रथम भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी घुसखोरांना प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. या युद्धात ज्याप्रमाणे हवाई दलाने महत्त्वाची भूमिका पार पाडली, त्याचप्रमाणे भारतीय सैन्यानेसुद्धा बोफोर्स तोफांचा यशस्वी वापर करून पाकला चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात ३० हजार भारतीय लढले. या युद्धात अकोल्याचे सुपुत्र सुनील उपाध्ये यांनीही सहभाग नोंदविला होता. यावेळी त्यांनी अनुभवलेले थरारक अनुभवही ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले. कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर सीमेवरील वातावरण कसे आहे, ही माहिती घेण्यासाठी ते ॲडव्हान्स लॅन्डिंग पोस्टवर त्यांच्या टीमसोबत गेले होते. यावेळी काही सैनिक त्यांच्या सोबत होेते. त्यांनी दिलेल्या हवामानाच्या माहितीनुसार सैन्याची पुढील दिशा ठरत असे. युद्ध सुरू असताना सतत डागले जाणारे रॉकेट, बंदुकांचा अनुभवही त्यांना आला. कारगिल युद्धात सहभाग नोंदवून केलेली कामगिरी आजही ते अभिमानाने सांगतात.

देश रक्षणाचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी तरुणांनी व पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवण्याची गरज आहे. तसेच जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी.

- सुनील उपाध्ये, माजी सैनिक

विजयस्टार पदकाने सन्मान

युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदविणाऱ्या सुनील उपाध्ये यांना विजयस्टार पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ते सध्या महावितरणच्या अमरावती मंडळात उपविधी अधिकारी म्हणून अकोला येथे कार्यरत आहेत.