शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

उणे तापमानातही अनुभवला कारगिल युद्धाचा थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:20 IST

अकोला : पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिलच्या युद्धात १८ हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी सहभाग ...

अकोला : पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिलच्या युद्धात १८ हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी सहभाग नोंदवीत युद्ध जिंकले. या युद्धात हवाई दल योद्धा म्हणून प्रत्यक्ष लढलेल्या सुनील उपाध्ये यांनी ‘कारगिल’च्या आठवणींना उजाळा दिला. ३० ते ४० अंश उणे तापमानातही सैन्याच्या पोस्टवर त्यांनी युद्धाचा थरार अनुभवला. अत्यंत कठीण परिस्थितीत लढत जवानांनी दाखवलेले शौर्य आजही अंगावर रोमांच उभे करते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले हे सर्वसाधारण युद्ध नव्हते. पाकिस्तानकडून घुसखोरी झाल्याची माहिती मिळताच सर्वप्रथम भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी घुसखोरांना प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. या युद्धात ज्याप्रमाणे हवाई दलाने महत्त्वाची भूमिका पार पाडली, त्याचप्रमाणे भारतीय सैन्यानेसुद्धा बोफोर्स तोफांचा यशस्वी वापर करून पाकला चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात ३० हजार भारतीय लढले. या युद्धात अकोल्याचे सुपुत्र सुनील उपाध्ये यांनीही सहभाग नोंदविला होता. यावेळी त्यांनी अनुभवलेले थरारक अनुभवही ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले. कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर सीमेवरील वातावरण कसे आहे, ही माहिती घेण्यासाठी ते ॲडव्हान्स लॅन्डिंग पोस्टवर त्यांच्या टीमसोबत गेले होते. यावेळी काही सैनिक त्यांच्या सोबत होेते. त्यांनी दिलेल्या हवामानाच्या माहितीनुसार सैन्याची पुढील दिशा ठरत असे. युद्ध सुरू असताना सतत डागले जाणारे रॉकेट, बंदुकांचा अनुभवही त्यांना आला. कारगिल युद्धात सहभाग नोंदवून केलेली कामगिरी आजही ते अभिमानाने सांगतात.

देश रक्षणाचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी तरुणांनी व पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवण्याची गरज आहे. तसेच जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी.

- सुनील उपाध्ये, माजी सैनिक

विजयस्टार पदकाने सन्मान

युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदविणाऱ्या सुनील उपाध्ये यांना विजयस्टार पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ते सध्या महावितरणच्या अमरावती मंडळात उपविधी अधिकारी म्हणून अकोला येथे कार्यरत आहेत.