शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्यांनी दिला पाच काेटींच्या अतिरिक्त कामाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:19 IST

अकाेला: ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरातील काही भागात जलवाहिनीची कामे करताना अतिरिक्त कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी ...

अकाेला: ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरातील काही भागात जलवाहिनीची कामे करताना अतिरिक्त कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी तब्बल पाच काेटी सहा लाख रुपयांचा प्रस्ताव (जादा परिमाण) स्थायी समितीसमाेर सादर केला असता, त्यावर काॅंग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप नाेंदवला. कार्यकारी अभियंत्यांना ३० लाख रुपयांपेक्षा जादा परिमाणाला मंजुरी देण्याचा अधिकार नसल्याचा तांत्रिक मुद्दा सेनेचे गटनेते राजेश मिश्रा, काॅंग्रेसचे इरफान खान, पराग कांबळे यांनी उपस्थित करत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली़.

मनपात साेमवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरात पाणीपुरवठ्यांची कामे सुरू आहेत. या दरम्यान, प्रारंभीपासून कंत्राटदाराने मनमानी पध्दतीने कामे करत रस्त्यांची माेठ्या प्रमाणात ताेडफाेड केली आहे. त्यांची दुरूस्ती करण्याकडे कंत्राटदाराने पाठ फिरवल्याचा आराेप सेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी केला. कंत्राटदाराने ‘डीपीआर’नुसार कामे केली किंवा नाही, आजवर किती टक्के काम पूर्ण झाले आणि त्या बदल्यात किती रुपयांची देयके अदा केली, याचा खुलासा तांत्रिक सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून हाेइल का, असे अनेक प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केले. शिवसेना व काॅंग्रेस नगरसेवकांच्या प्रभागातील कामे जाणीवपूर्वक अर्धवटस्थितीत आहेत. ही कामे कधी मार्गी लागतील, असा प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केला असता, प्रशासनाने व सत्ता पक्षाने यावर गप्प राहणे पसंत केले.

प्रस्तावाला काॅंग्रेसचा विराेध

मजीप्राच्या माध्यमातून मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे ५ कोटी ६ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यावर काॅंग्रेसचे सदस्य माेहम्मद इरफान, पराग कांबळे यांनी आक्षेप घेतला. मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी ३० लाखांपेक्षा अधिक किमतीचा जादा परिमाणाचा प्रस्ताव तयार केल्यास त्याला मुख्य अभियंता तसेच मजीप्राच्या सदस्य सचिवांची मंजुरी क्रमप्राप्त ठरते. अशावेळी कार्यकारी अभियंत्यांनी एवढ्या माेठ्या रकमेचा प्रस्ताव सादर केला कसा, असा प्रश्न या दाेन्ही नगरसेवकांनी उपस्थित केला.

कामे मार्गी लागावीत हा उद्देश!

जलवाहिनीचे जाळे टाकताना तसेच नळजोडणी देताना प्रत्यक्षात अनेक कामांमध्ये बदल झाला. अनेक कामे अर्धवट असल्याने ती पावसाळ्यापूर्वी मार्गी लागावीत, हा उद्देश असल्याचे सांगत स्थायी समितीचे सभापती संजय बडाेणे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.