शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

कार्यकारी अभियंत्यांनी दिला पाच काेटींच्या अतिरिक्त कामाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:19 IST

अकाेला: ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरातील काही भागात जलवाहिनीची कामे करताना अतिरिक्त कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी ...

अकाेला: ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरातील काही भागात जलवाहिनीची कामे करताना अतिरिक्त कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी तब्बल पाच काेटी सहा लाख रुपयांचा प्रस्ताव (जादा परिमाण) स्थायी समितीसमाेर सादर केला असता, त्यावर काॅंग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप नाेंदवला. कार्यकारी अभियंत्यांना ३० लाख रुपयांपेक्षा जादा परिमाणाला मंजुरी देण्याचा अधिकार नसल्याचा तांत्रिक मुद्दा सेनेचे गटनेते राजेश मिश्रा, काॅंग्रेसचे इरफान खान, पराग कांबळे यांनी उपस्थित करत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली़.

मनपात साेमवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरात पाणीपुरवठ्यांची कामे सुरू आहेत. या दरम्यान, प्रारंभीपासून कंत्राटदाराने मनमानी पध्दतीने कामे करत रस्त्यांची माेठ्या प्रमाणात ताेडफाेड केली आहे. त्यांची दुरूस्ती करण्याकडे कंत्राटदाराने पाठ फिरवल्याचा आराेप सेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी केला. कंत्राटदाराने ‘डीपीआर’नुसार कामे केली किंवा नाही, आजवर किती टक्के काम पूर्ण झाले आणि त्या बदल्यात किती रुपयांची देयके अदा केली, याचा खुलासा तांत्रिक सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून हाेइल का, असे अनेक प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केले. शिवसेना व काॅंग्रेस नगरसेवकांच्या प्रभागातील कामे जाणीवपूर्वक अर्धवटस्थितीत आहेत. ही कामे कधी मार्गी लागतील, असा प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केला असता, प्रशासनाने व सत्ता पक्षाने यावर गप्प राहणे पसंत केले.

प्रस्तावाला काॅंग्रेसचा विराेध

मजीप्राच्या माध्यमातून मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे ५ कोटी ६ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यावर काॅंग्रेसचे सदस्य माेहम्मद इरफान, पराग कांबळे यांनी आक्षेप घेतला. मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी ३० लाखांपेक्षा अधिक किमतीचा जादा परिमाणाचा प्रस्ताव तयार केल्यास त्याला मुख्य अभियंता तसेच मजीप्राच्या सदस्य सचिवांची मंजुरी क्रमप्राप्त ठरते. अशावेळी कार्यकारी अभियंत्यांनी एवढ्या माेठ्या रकमेचा प्रस्ताव सादर केला कसा, असा प्रश्न या दाेन्ही नगरसेवकांनी उपस्थित केला.

कामे मार्गी लागावीत हा उद्देश!

जलवाहिनीचे जाळे टाकताना तसेच नळजोडणी देताना प्रत्यक्षात अनेक कामांमध्ये बदल झाला. अनेक कामे अर्धवट असल्याने ती पावसाळ्यापूर्वी मार्गी लागावीत, हा उद्देश असल्याचे सांगत स्थायी समितीचे सभापती संजय बडाेणे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.