शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कार्यकारी अभियंत्यांनी दिला पाच काेटींच्या अतिरिक्त कामाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:19 IST

अकाेला: ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरातील काही भागात जलवाहिनीची कामे करताना अतिरिक्त कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी ...

अकाेला: ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरातील काही भागात जलवाहिनीची कामे करताना अतिरिक्त कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी तब्बल पाच काेटी सहा लाख रुपयांचा प्रस्ताव (जादा परिमाण) स्थायी समितीसमाेर सादर केला असता, त्यावर काॅंग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप नाेंदवला. कार्यकारी अभियंत्यांना ३० लाख रुपयांपेक्षा जादा परिमाणाला मंजुरी देण्याचा अधिकार नसल्याचा तांत्रिक मुद्दा सेनेचे गटनेते राजेश मिश्रा, काॅंग्रेसचे इरफान खान, पराग कांबळे यांनी उपस्थित करत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली़.

मनपात साेमवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरात पाणीपुरवठ्यांची कामे सुरू आहेत. या दरम्यान, प्रारंभीपासून कंत्राटदाराने मनमानी पध्दतीने कामे करत रस्त्यांची माेठ्या प्रमाणात ताेडफाेड केली आहे. त्यांची दुरूस्ती करण्याकडे कंत्राटदाराने पाठ फिरवल्याचा आराेप सेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी केला. कंत्राटदाराने ‘डीपीआर’नुसार कामे केली किंवा नाही, आजवर किती टक्के काम पूर्ण झाले आणि त्या बदल्यात किती रुपयांची देयके अदा केली, याचा खुलासा तांत्रिक सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून हाेइल का, असे अनेक प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केले. शिवसेना व काॅंग्रेस नगरसेवकांच्या प्रभागातील कामे जाणीवपूर्वक अर्धवटस्थितीत आहेत. ही कामे कधी मार्गी लागतील, असा प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केला असता, प्रशासनाने व सत्ता पक्षाने यावर गप्प राहणे पसंत केले.

प्रस्तावाला काॅंग्रेसचा विराेध

मजीप्राच्या माध्यमातून मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे ५ कोटी ६ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यावर काॅंग्रेसचे सदस्य माेहम्मद इरफान, पराग कांबळे यांनी आक्षेप घेतला. मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी ३० लाखांपेक्षा अधिक किमतीचा जादा परिमाणाचा प्रस्ताव तयार केल्यास त्याला मुख्य अभियंता तसेच मजीप्राच्या सदस्य सचिवांची मंजुरी क्रमप्राप्त ठरते. अशावेळी कार्यकारी अभियंत्यांनी एवढ्या माेठ्या रकमेचा प्रस्ताव सादर केला कसा, असा प्रश्न या दाेन्ही नगरसेवकांनी उपस्थित केला.

कामे मार्गी लागावीत हा उद्देश!

जलवाहिनीचे जाळे टाकताना तसेच नळजोडणी देताना प्रत्यक्षात अनेक कामांमध्ये बदल झाला. अनेक कामे अर्धवट असल्याने ती पावसाळ्यापूर्वी मार्गी लागावीत, हा उद्देश असल्याचे सांगत स्थायी समितीचे सभापती संजय बडाेणे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.