शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गावठाणाच्या जागेतून वाळूचे उत्खनन, पशुपालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:20 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील तुलंगा खुर्द गावाला लागून असलेल्या गावठाणाच्या जागेतून गत महिनाभरापासून वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू ...

खेट्री : पातूर तालुक्यातील तुलंगा खुर्द गावाला लागून असलेल्या गावठाणाच्या जागेतून गत महिनाभरापासून वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू आहे. वाळूचे उत्खनन करणाऱ्यांनी मोठमोठे खड्डे केल्यामुळे किरकोळ घटना घडल्या असून, मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील पशुपालक गावठाणात जनावरे चारण्यासाठी सोडतात; परंतु गावठाणाच्या जागेत वाळू माफियांनी खड्डे केल्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत. वाळूचे उत्खनन गावातील एका राजकीय पुढाऱ्याकडून हाेत असल्याची चर्चा आहे.

राजकीय पुढाऱ्यांचा गावात वचक असल्याने तक्रार करण्याची कुणी हिंमत दाखवत नाही, तसेच महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई केली जात नाही, त्यामुळे वाळूचे उत्खनन करून रात्रंदिवस अवैध वाहतूक सुरू आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडल्याचे चित्र आहे. उत्खनन थांबवून उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत तलाठ्यांशी वारंवार संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

जवळपास दोनशे ब्रास झाले वाळूचे उत्खनन

गावठाणाच्या जागेतून महिनाभरापासून जवळपास दोनशे ब्रास वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक केल्याचे दिसून येत आहे. यावर महसूल विभाग काय कारवाई करणार, याकडे गावासह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

..........

महसूल विभागावर राजकीय दबाव

तुलंगा खुर्द येथे गावठाणच्या जागेतून एका राजकीय पुढारी मजुरांद्वारे उत्खनन करून अवैध वाहतूक करीत आहे. महसूल विभागावर राजकीय दबाव असल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. वरिष्ठांनी दाखल घेणे गरजेचे आहे.

...............................

दरड कोसळल्याच्या घटनेत वाढ

गावठाणच्या जागेतून मजूर वाळूचे उत्खनन करतात. त्यामुळे अनेक वेळा दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच मजुरांना किरकोळ इजासुद्धा झाल्याचे बोलले जात आहे. जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...................

तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी

तुलंगा खुर्द येथील तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी आहे. त्यामुळे बिनधास्त वाळू माफिया उत्खनन करून अवैध वाहतूक करीत आहे. तलाठ्यावर वरिष्ठांचा वचक नसल्याने तलाठी दिवसातसुद्धा फिरकत नाही.