शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

परीक्षांचा खेळ, सीईटी अर्जाची मुदत आधी, बारावीचा निकाल नंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे शिक्षणक्षेत्रात माेठी उलथापालथ झाली असून, परीक्षांचा खेळ झाला आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात ...

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे शिक्षणक्षेत्रात माेठी उलथापालथ झाली असून, परीक्षांचा खेळ झाला आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी - सीईटी परीक्षेपासून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली आणि इयत्ता बारावीचा निकाल ४ ऑगस्टला जाहीर झाला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ उडाला असून, अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते. यावर्षी काेराेनामुळे इयत्ता १२वीचे निकाल रखडले हाेते. इयत्ता १२वीचे निकाल लागण्यापूर्वीच सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली. त्यानंतर इयत्ता १२वीचा निकाल ४ ऑगस्ट राेजी जाहीर करण्यात आला. यावर्षी १२वी उत्तीर्ण झालेले हजाराे विद्यार्थी या परीेक्षेसाठी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी हाेत आहे.

अर्ज करण्यासाठी हवी मुदतवाढ

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपलेली हाेती. त्यामुळे, यावर्षी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले जिल्ह्यातील हजाराे विद्यार्थी सीईटीसाठी अर्ज करू शकलेले नाहीत. त्यामुळे, अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. त्यामुळे, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सीईटीसाठी इच्छा असूनही अर्ज करता आला नाही. मुदत आधी हाेती व १२वीचा निकाल नंतर लागला, यात आमची काय चूक आहे. मुदत वाढली तर अर्ज करता येईल.

जयेश सरदार, विद्यार्थी

सीईटी परीक्षा महत्त्वाची आहे. त्याची तयारीही केली आहे. मात्र, मुदत संपल्याने अर्ज करता आला नाही. आता अर्ज करण्याची संधी मिळाली तर उत्तम हाेईल.

उन्मेष देशमुख, विद्यार्थी