शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

परीक्षांचा खेळ, सीईटी अर्जाची मुदत आधी, बारावीचा निकाल नंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे शिक्षणक्षेत्रात माेठी उलथापालथ झाली असून, परीक्षांचा खेळ झाला आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात ...

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे शिक्षणक्षेत्रात माेठी उलथापालथ झाली असून, परीक्षांचा खेळ झाला आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी - सीईटी परीक्षेपासून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली आणि इयत्ता बारावीचा निकाल ४ ऑगस्टला जाहीर झाला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ उडाला असून, अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते. यावर्षी काेराेनामुळे इयत्ता १२वीचे निकाल रखडले हाेते. इयत्ता १२वीचे निकाल लागण्यापूर्वीच सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली. त्यानंतर इयत्ता १२वीचा निकाल ४ ऑगस्ट राेजी जाहीर करण्यात आला. यावर्षी १२वी उत्तीर्ण झालेले हजाराे विद्यार्थी या परीेक्षेसाठी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी हाेत आहे.

अर्ज करण्यासाठी हवी मुदतवाढ

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपलेली हाेती. त्यामुळे, यावर्षी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले जिल्ह्यातील हजाराे विद्यार्थी सीईटीसाठी अर्ज करू शकलेले नाहीत. त्यामुळे, अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. त्यामुळे, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सीईटीसाठी इच्छा असूनही अर्ज करता आला नाही. मुदत आधी हाेती व १२वीचा निकाल नंतर लागला, यात आमची काय चूक आहे. मुदत वाढली तर अर्ज करता येईल.

जयेश सरदार, विद्यार्थी

सीईटी परीक्षा महत्त्वाची आहे. त्याची तयारीही केली आहे. मात्र, मुदत संपल्याने अर्ज करता आला नाही. आता अर्ज करण्याची संधी मिळाली तर उत्तम हाेईल.

उन्मेष देशमुख, विद्यार्थी