शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीची होणार तपासणी

By admin | Updated: August 29, 2014 01:55 IST

तीन वर्षातील लागवडीच्या कामांची केली जाणार तपासणी

संतोष येलकर/अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतींमार्फत गेल्या तीन वर्षांमध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांची विशेष तपासणी केली जाणार जाणार आहे. माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या हरित संरक्षण गटांकडून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविला जातो. रस्त्याच्या दुतर्फा, पडीक शेतजमीन, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात वृक्ष लागवड केली जाते. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारीही काही कुटुंबांवर सोपविली जाते. या पृष्ठभूमीवर सन २0११, २0१२ आणि २0१३ या तीन वर्षाच्या पावसाळी हंगामात ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत गत १९ ऑगस्ट रोजी एका परिपत्रकाव्दारे देण्यात आले होते. त्यानुसार ही विशेष तपासणी २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केली जाणार आहे. वृक्ष लागवड झाली नाही, रोपे जीवंत आहेत की नाही, ज्या ठिकाणी रोपे जीवंत नाहीत, त्या ठिकाणी पुनर्लागवड करणे, अशी सुधारणात्मक कृती हाती घेणे हा या विशेष तपासणी मोहिमेचा उद्देश आहे. विशेष तपासणी मोहिमेसाठी जिल्हानिहाय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील या समित्यांमध्ये सदस्य सचिव म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक आणि सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), उपजिल्हाधिकारी (रोहयो), शिक्षणाधिकरी इत्यांदींचा समावेश आहे. तपासणीचा अहवाल हरित संरक्षण गटांमार्फत सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हानिहाय अहवाल शासनाच्या संबंधित विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत.उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे यांनी ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याबाबतचे शासन परिपत्रक २२ ऑगस्ट रोजी प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी एक तृतीयांश ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या कामांची तपासणी १ सप्टेंबरपासून अकोला जिल्ह्यात सुरु करण्यात आहे. ज्या ठिकाणी हरित संरक्षण गटांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी तपासणीच्या कामासाठी एनएसएस विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगीतले. *वृक्ष लागवडीच्या कामाचे वास्तव येणार समोर!ग्रामपंचायतीअंतर्गत गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेली वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये ग्रामपंचायतींनी केलेली वृक्ष लागवड, त्यावर करण्यात आलेला खर्च आणि सध्या जीवंत असलेली रोपे याबाबतचे वास्तव या तपासणीतून समोर येणार आहे.