शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

यंदाही शेतकऱ्यांना चिखल तुडवित जावे लागते शेतात; शेतमालाच्या वाहतुकीचीही चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

संतोष येलकर अकोला : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार १०० किलोमीटरच्या ९९ पाणंद रस्ते कामांचे नियोजन ...

संतोष येलकर

अकोला : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार १०० किलोमीटरच्या ९९ पाणंद रस्ते कामांचे नियोजन कोलमडले. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना चिखल तुडवित शेतात जावे लागत असून, शेतात तयार होणाऱ्या शेतमालाची वाहतूक चिखलमय रस्त्यातून करणार तरी कशी, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यानुषंगाने पाणंद रस्त्यांची कामे होणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यात २ हजार १०० किलोमीटरच्या ९९ पाणंद रस्ते कामांचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. प्रस्तावित पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६ कोटी ४३ लाख ६३ हजार रुपयांचा निधी १८ मार्चपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात आला. परंतु पाणंद रस्त्यांची कामे अद्यापही सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिखल तुडवित शेतात जावे लागत आहे. पावसाळ्यात शेतरस्ते चिखलमय होत असल्याने, शेतात जाणे येणे करण्यासाठी चिखलमय रस्त्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. रस्त्यांअभावी शेती कामांसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर चिखलातून शेतात नेणार कशी, याबाबतच्या समस्येचा शेतकऱ्यांचा सामना करावा लागत आहे. यासोबतच शेतात तयार होणाऱ्या शेतमालाची चिखलमय रस्त्यातून वाहतूक करणार तरी कशी, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पार्श्वभूमीवर शेतात जाणे येणे करण्यासाठी पाणंद रस्त्यांची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केव्हा थांबणार शेतकऱ्यांचे हाल?

शेतरस्त्यांची कामे करण्यात आली नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाणे येणे करावे लागते. चिखलातून शेतात वाहन नेणे शक्य होत नसल्याने, शेतात तयार झालेला शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा शेतात तयार झालेल्या शेतमालाचे गाठोडे बांधून शेतकरी व शेतमजुरांना डोक्यावर ने-आण करावी लागते. त्यामुळे चिखल तुडवित शेतातून शेतमाल घरी आणताना शेतकऱ्यांना सोसावे लागणारे हाल थांबणार तरी केव्हा, याबाबतचा प्रश्न निर्माण होत आहे.

पाणंद रस्त्यांची अशी

आहेत प्रस्तावित कामे!

उपविभाग रस्ते

अकोट ६६

अकोला ०७

बाळापूर १७

मूर्तिजापूर ०९

................................................

एकूण ९९

गावात शेतरस्त्याचे काम करण्यात आले नसल्याने शेतरस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे चिखल तुडवित शेतात जाणे येणे करावे लागते. चिखलमय रस्त्यातून शेतात तयार झालेला शेतमाल घरी आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चिखलमय रस्त्यातून शेतमालाची वाहतूक करता येत नसल्याने अनेकदा तयार झालेल्या शेतमालावर ताडपत्री टाकून शेतातच ठेवावा लागतो.

- शिवाजीराव भरणे, शेतकरी, रामगाव

जिल्ह्यात ९९ पाणंद रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ६ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पाणंद रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोला