शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातही झाला होता क्रांतीचा उद्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:03 IST

अकोला: मुंबई येथील क्रांती मैदानावर ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अंतिम लढय़ाची घोषणा केली. ‘करा किंवा मरा’ असा संदेश दिला. त्यामुळे महात्मा गांधींना अटक झाली आणि त्यांच्या अटकेचा निषेधार्थ भारतीयांनी क्रांतीचा हुंकार फुंकला. क्रांतीच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.  त्याचे लोण अकोल्यातही पसरले होते. मोर्चा, सत्याग्रह, चले जाव आंदोलनाने अकोला शहर दणाणून गेले होते. तो काळ अविस्मरणीय, प्रेरणादायी होता.  

ठळक मुद्दे क्रांती दिन विशेषअनेकांनी पत्करला तुरुंगवास

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मुंबई येथील क्रांती मैदानावर ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अंतिम लढय़ाची घोषणा केली. ‘करा किंवा मरा’ असा संदेश दिला. त्यामुळे महात्मा गांधींना अटक झाली आणि त्यांच्या अटकेचा निषेधार्थ भारतीयांनी क्रांतीचा हुंकार फुंकला. क्रांतीच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.  त्याचे लोण अकोल्यातही पसरले होते. मोर्चा, सत्याग्रह, चले जाव आंदोलनाने अकोला शहर दणाणून गेले होते. तो काळ अविस्मरणीय, प्रेरणादायी होता.  अकोल्यातील ऑगस्ट क्रांती लढय़ामध्ये स्वातंत्र्यसेनानी स्व. अच्युतराव देशपांडे, स्व. प्रमिलाताई ओक, मुनी गुरुजी, लक्ष्मणराव गोडबोले, हिरुळकर गुरुजी, देवीदासजी गरड आदी त्याकाळातील स्वातंत्र्यसंग्रामातील धडाडीचे नेते होते. स्वातंत्र्यासाठी अनेक काळ या सर्व नेत्यांनी काही तुरुंगवास भोगला. स्व. प्रमिलाताई ओक, विमलताई देशपांडे यांच्या नेतृत्वात प्रभातफेर्‍या, राष्ट्रीय झेंड्याची मिरवणूक, पत्रके वाटण्याचे काम केले. १३ ऑगस्ट १९४२ साली. क्रांती लढय़ाचा सर्वात मोठा मोर्चा निघाला. त्यात महिला अग्रभागी होत्या. या महिलांनीच काँग्रेस मैदान (आताचे स्वराज्य भवन) येथे राष्ट्रीय झेंडा फडकवण्याचा प्रयोग झाला. पोलिसांनी बलाचा वापर करून लाठीमार केला. महिलांच्या मोर्चावर लाठीमार केल्याने लोक खवळले होते. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी क्रूर लाठीमार केला. अनेक लोक जखमी झाले. यात अनेक स्वातंत्र्यसेनानींना अटक झाली होती. स्वातंत्र्यसेनानी देवीदास गरड यांनी साथीदारांच्या मदतीने त्यांच्या घरातच बॉम्बची निर्मिती केली होती; परंतु बॉम्ब बनविण्यामध्ये काही त्रुटी राहिल्याने, बॉम्बचा अचानक स्फोट झाला. त्यात देवीदास गरड आणि त्यांचे काही साथीदार गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर ब्रिटिशांनी गरड यांना अटक केली होती. त्या काळी वाडेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सभा झाली होती. भाटे क्लबच्या मैदानावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सभा घेऊन नागरिकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची जाज्वल्य भावना निर्माण केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोससुद्धा त्यादरम्यान अकोल्यात येऊन गेले. त्या काळी तर टिळक राष्ट्रीय शाळासुद्धा क्रांती लढय़ाचा एक भाग बनली होती. टिळक राष्ट्रीय शाळेतून अनेक विद्यार्थी क्रांती लढय़ात सहभागी झाले होते. 

सुखदेव, राजगुरूंनी घेतला होता आश्रय स्वातंत्र्यलढा तीव्र करण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी अकोल्यात येऊन गेले. महान स्वातंत्र्यसेनानी सुखदेव, राजगुरू यांची धरपकड करण्यासाठी ब्रिटिशांनी मोहीम अधिक तीव्र केली होती. उत्तर भारतात राहणे असुरक्षित होते. या कारणामुळे सुखदेव, राजगुरू यांना काही स्वातंत्र्यसैनिकांनी अकोल्यात आश्रय दिल्याची नोंद आहे.