शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

‘अमृत’ अंतर्गत सात जलकुंभ उभारले; आठव्यासाठी मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे आणि नवीन ...

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे आणि नवीन आठ जलकुंभ उभारणीच्या कामासाठी मनपाने एपीअँडजीपी कंपनीला कार्यादेश दिले आहेत. कंपनीने सात जलकुंभ उभारले असून, जुने शहरातील डाॅ. आंबेडकर मैदानलगतच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याचे समाेर आले आहे. जलकुंभाच्या उभारणीला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध असून, या ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धाकदपट करून हाकलून लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता. स्थानिक रहिवाशांच्या विरोधासमोर मनपा प्रशासन हतबल ठरत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पाेलिसांकडून ‘तारीख पे तारीख’

स्थानिक रहिवाशांचा विराेध लक्षात घेता मनपाने सुरक्षेसाठी पाेलीस बंदाेबस्ताची मागणी केली असता पाेलीस ठाण्यातून ‘तारीख पे तारीख’दिली जात आहे. यामुळे पाेलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मजीप्राने साधली चुपी; अहवाल का नाही?

अमृत अभियानमधील भूमिगत गटार योजना व पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली आहे. या दोन्ही योजनांच्या कामाच्या मोबदल्यात मजीप्राला तीन टक्के रक्कम अदा केली जाणार आहे. मागील दाेन वर्षांपासून जलकुंभाच्या उभारणीला विलंब होत असतानाही मजीप्राने यासंदर्भात मनपाला अहवाल का दिला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

डाबकी रोड येथील जलकुंभाच्या उभारणीला विलंब झाल्याची बाब मान्य आहे. स्थानिक रहिवाशांचा निरर्थक विरोध आहे. कामाला सुरुवात करण्यासाठी पाेलिसांकडे सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे.

- सुरेश हुंगे ,कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, मनपा